AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डाएट करताना दिवसातून किती चपात्या खाव्यात? 10-90 चा नियम काय सांगतो?

वजन कमी करण्याच्या नादात चपाती खाणे पूर्णपणे बंद करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. वजन कमी करताना दिवसातून किती चपात्या खाव्यात आणि प्रथिनांचे प्रमाण किती असावे, याबद्दल तज्ज्ञांनी दिलेला विशेष सल्ला या लेखात वाचा.

| Updated on: May 09, 2026 | 1:42 PM
Share
भारतीय जेवणात चपाती, पोळी किंवा रोटी हा मुख्य आधार मानला जातो. मात्र, जेव्हा विषय वजन कमी करण्याचा येतो, तेव्हा सर्वात आधी चपाती खाऊ नका असेच सांगितले जाते. अनेकजण कार्ब्स कमी करण्याच्या नादात चपाती खाणे पूर्णपणे बंद करतात. पण हे आरोग्यासाठी कितपत योग्य आहे? वजन कमी करताना नेमक्या किती चपात्या खाव्यात, याबद्दल आज आपण जाणून घेऊया.

भारतीय जेवणात चपाती, पोळी किंवा रोटी हा मुख्य आधार मानला जातो. मात्र, जेव्हा विषय वजन कमी करण्याचा येतो, तेव्हा सर्वात आधी चपाती खाऊ नका असेच सांगितले जाते. अनेकजण कार्ब्स कमी करण्याच्या नादात चपाती खाणे पूर्णपणे बंद करतात. पण हे आरोग्यासाठी कितपत योग्य आहे? वजन कमी करताना नेमक्या किती चपात्या खाव्यात, याबद्दल आज आपण जाणून घेऊया.

1 / 8
अनेकांना वाटते की चपाती सोडल्याने वजन झपाट्याने कमी होईल. मात्र, तज्ज्ञांच्या मते चपाती पूर्णपणे बंद करणे चुकीचे आहे. गहू, बाजरी किंवा नाचणी यांसारख्या धान्यांपासून बनवलेल्या भाकऱ्यांमध्ये फायबर आणि आवश्यक पोषक घटक असतात. हे घटक तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे तुम्हाला वारंवार भूक लागत नाही.

अनेकांना वाटते की चपाती सोडल्याने वजन झपाट्याने कमी होईल. मात्र, तज्ज्ञांच्या मते चपाती पूर्णपणे बंद करणे चुकीचे आहे. गहू, बाजरी किंवा नाचणी यांसारख्या धान्यांपासून बनवलेल्या भाकऱ्यांमध्ये फायबर आणि आवश्यक पोषक घटक असतात. हे घटक तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे तुम्हाला वारंवार भूक लागत नाही.

2 / 8
जयपूर येथील आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. किरण गुप्ता यांच्या मते, वजन कमी करण्याच्या प्रवासात चपात्या एकदम बंद न करता ते हळूहळू कमी करावे. जर तुम्ही सध्या ३ चपात्या खात असाल तर काही दिवस २ चपात्या खा आणि त्यानंतर हळूहळू एका चपातीवर या.

जयपूर येथील आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. किरण गुप्ता यांच्या मते, वजन कमी करण्याच्या प्रवासात चपात्या एकदम बंद न करता ते हळूहळू कमी करावे. जर तुम्ही सध्या ३ चपात्या खात असाल तर काही दिवस २ चपात्या खा आणि त्यानंतर हळूहळू एका चपातीवर या.

3 / 8
तुमच्या एकूण आहाराच्या तुलनेत रोट्यांचे प्रमाण केवळ १० टक्के असावे. उर्वरित ९० टक्के आहारात सॅलड, पालेभाज्या, डाळी आणि इतर फायबरयुक्त पदार्थांचा समावेश असावा. केवळ चपात्या कमी करून चालणार नाही, तर शरीराला योग्य प्रमाणात प्रथिने मिळणेही गरजेचे आहे.

तुमच्या एकूण आहाराच्या तुलनेत रोट्यांचे प्रमाण केवळ १० टक्के असावे. उर्वरित ९० टक्के आहारात सॅलड, पालेभाज्या, डाळी आणि इतर फायबरयुक्त पदार्थांचा समावेश असावा. केवळ चपात्या कमी करून चालणार नाही, तर शरीराला योग्य प्रमाणात प्रथिने मिळणेही गरजेचे आहे.

4 / 8
प्रथिनांमुळे स्नायूंची निर्मिती होते आणि चरबी जाळण्यास मदत होते. तुमच्या वजनाच्या प्रति किलोमागे १.२ ते १.५ ग्रॅम प्रथिने घेणे आवश्यक आहे. जे लोक जिम किंवा वेट ट्रेनिंग करतात, त्यांनी प्रति किलो १.६ ते २.२ ग्रॅम प्रथिने घेणे अपेक्षित आहे.

प्रथिनांमुळे स्नायूंची निर्मिती होते आणि चरबी जाळण्यास मदत होते. तुमच्या वजनाच्या प्रति किलोमागे १.२ ते १.५ ग्रॅम प्रथिने घेणे आवश्यक आहे. जे लोक जिम किंवा वेट ट्रेनिंग करतात, त्यांनी प्रति किलो १.६ ते २.२ ग्रॅम प्रथिने घेणे अपेक्षित आहे.

5 / 8
रात्रीच्या जेवणात चपात्यांचे प्रमाण कमी ठेवा. तसेच झोपण्यापूर्वी किमान ३ तास आधी जेवा. केवळ गव्हाच्या चपाती खाण्याऐवजी मल्टिग्रेन किंवा ज्वारी-बाजरीच्या भाकरीचा समावेश करा. त्यासोबतच भरपूर पाणी प्या.

रात्रीच्या जेवणात चपात्यांचे प्रमाण कमी ठेवा. तसेच झोपण्यापूर्वी किमान ३ तास आधी जेवा. केवळ गव्हाच्या चपाती खाण्याऐवजी मल्टिग्रेन किंवा ज्वारी-बाजरीच्या भाकरीचा समावेश करा. त्यासोबतच भरपूर पाणी प्या.

6 / 8
रोज किमान ३० मिनिटे चालण्याचा व्यायाम करा. थोडक्यात सांगायचे तर, वजन कमी करण्यासाठी उपाशी राहण्यापेक्षा योग्य प्रमाणात खाणे हा सर्वात बेस्ट पर्याय आहे.

रोज किमान ३० मिनिटे चालण्याचा व्यायाम करा. थोडक्यात सांगायचे तर, वजन कमी करण्यासाठी उपाशी राहण्यापेक्षा योग्य प्रमाणात खाणे हा सर्वात बेस्ट पर्याय आहे.

7 / 8
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

8 / 8
Follow Us
NCP शरद पवार गटातील 8 खासदारांची मोदींसोबत बैठक; रोहित पवार म्हणाले...
NCP शरद पवार गटातील 8 खासदारांची मोदींसोबत बैठक; रोहित पवार म्हणाले, 17 तारखेला...
ठाण्याच्या टिकोजीरावांना निवडणूक आयोगाने परस्परच... संजय राऊतांची टीका
ठाण्याच्या टिकोजीरावांना निवडणूक आयोगाने परस्परच... बोलता बोलता संजय राऊत असं काही म्हणाले की.. विधानाची तुफान चर्चा
समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन, सत्यजित तांबे आणि पोलिसात झटापट,
समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन, सत्यजित तांबे आणि पोलिसात झटापट, आंदोलक आक्रमक
आदित्य ठाकरे आणि CJP पदाधिकाऱ्यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? Inside...
आदित्य ठाकरे आणि CJP पदाधिकाऱ्यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? अखेर Inside स्टोरी समोर
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्..
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्...हादरवून टाकणारं प्रकरण समोर!
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, 'माझं...
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, “माझं रक्तच तसं नाही जे कोणी...
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; 1.1 कोटींची गुंतवणूक
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; सिंगापूर करणार 1.1 कोटींची गुंतवणूक अन्...
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट,
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट, पहा नेमकं काय काय म्हणाले?
राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक...
मोठी बातमी! राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची चौकशी होणार
गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना....
Gunratna Sadavarte | पळा, पळा, पळा अरे...जरांगेंचा काळ...गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना गाण्यातून डिवचलं