AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त 25 रुपये खर्च करा आणि भारताचा कानाकोपरा फिरा, कसं कुठे, कधी? जाणून घ्या सर्व काही…

जागृती यात्रा ही एक अद्वितीय ट्रेन आहे जी फक्त २५ रुपयांमध्ये संपूर्ण भारताचा प्रवास करण्याची संधी देते. १६ वर्षांपासून चालणारी ही यात्रा उद्योजकतेवर लक्ष केंद्रित करते आणि १५ दिवसांत ८०० किलोमीटरचा प्रवास करते.

| Updated on: Jun 09, 2025 | 5:22 PM
Share
फिरायला जाणं आवडतं नाही, असा माणूस जगात शोधून सापडणार नाही. आपण नेहमीच धकाधकीच्या आयुष्य जगत असतो. त्यामुळे आपल्याला प्रत्येकाला फिरण्याची प्रचंड इच्छा असते. पण फिरायला जायचं म्हटलं की खर्चाचा प्रश्न येतो आणि मग अनेक प्लॅन्स तसेच राहतात.

फिरायला जाणं आवडतं नाही, असा माणूस जगात शोधून सापडणार नाही. आपण नेहमीच धकाधकीच्या आयुष्य जगत असतो. त्यामुळे आपल्याला प्रत्येकाला फिरण्याची प्रचंड इच्छा असते. पण फिरायला जायचं म्हटलं की खर्चाचा प्रश्न येतो आणि मग अनेक प्लॅन्स तसेच राहतात.

1 / 10
पण जर तुम्हाला फक्त २५ रुपयात संपूर्ण भारताचा प्रवास करता आला, तर किती मस्त ना! फिरण्याची आवड असलेल्यांना अशी एक अविश्वसनीय संधी चालून आली आहे.

पण जर तुम्हाला फक्त २५ रुपयात संपूर्ण भारताचा प्रवास करता आला, तर किती मस्त ना! फिरण्याची आवड असलेल्यांना अशी एक अविश्वसनीय संधी चालून आली आहे.

2 / 10
'जागृती यात्रा' नावाची एक विशेष ट्रेन तुम्हाला फक्त 25 रुपयांत संपूर्ण भारताचा प्रवास घडवते. 'उद्योजकतेच्या माध्यमातून भारताचे निर्माण' हे या यात्रेचे मुख्य उद्दिष्ट आहे. गेली 16 वर्षे ही ट्रेन सुरु आहे.

'जागृती यात्रा' नावाची एक विशेष ट्रेन तुम्हाला फक्त 25 रुपयांत संपूर्ण भारताचा प्रवास घडवते. 'उद्योजकतेच्या माध्यमातून भारताचे निर्माण' हे या यात्रेचे मुख्य उद्दिष्ट आहे. गेली 16 वर्षे ही ट्रेन सुरु आहे.

3 / 10
जागृती एक्सप्रेसमध्ये एकावेळी केवळ 500 प्रवाशांना प्रवास करता येतो. ही ट्रेन वर्षातून फक्त एकदाच धावते. त्यामुळे यात प्रवास करण्यासाठी तुम्हाला काही महिने आधी बुकिंग करावी लागते.

जागृती एक्सप्रेसमध्ये एकावेळी केवळ 500 प्रवाशांना प्रवास करता येतो. ही ट्रेन वर्षातून फक्त एकदाच धावते. त्यामुळे यात प्रवास करण्यासाठी तुम्हाला काही महिने आधी बुकिंग करावी लागते.

4 / 10
दरवर्षी मे महिन्यात या ट्रेनचे बुकिंग सुरू होते. नोव्हेंबरमध्ये या यात्रेला सुरुवात होते. जागृती एक्सप्रेस 15 दिवसांत 800 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करते. या प्रवासादरम्यान प्रवाशांना उद्योजकतेचे बारकावे शिकवले जातात, ज्यामुळे हा प्रवास केवळ मनोरंजकच नव्हे तर माहितीपूर्ण देखील ठरतो.

दरवर्षी मे महिन्यात या ट्रेनचे बुकिंग सुरू होते. नोव्हेंबरमध्ये या यात्रेला सुरुवात होते. जागृती एक्सप्रेस 15 दिवसांत 800 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करते. या प्रवासादरम्यान प्रवाशांना उद्योजकतेचे बारकावे शिकवले जातात, ज्यामुळे हा प्रवास केवळ मनोरंजकच नव्हे तर माहितीपूर्ण देखील ठरतो.

5 / 10
या ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी एक महत्त्वाची अट आहे ती म्हणजे तुमचे वय 21 ते 27 वर्षांच्या दरम्यान असणं गरजेचे आहे. या वयोगटाबाहेरील व्यक्तींना या ट्रेनमध्ये प्रवास करता येत नाही.

या ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी एक महत्त्वाची अट आहे ती म्हणजे तुमचे वय 21 ते 27 वर्षांच्या दरम्यान असणं गरजेचे आहे. या वयोगटाबाहेरील व्यक्तींना या ट्रेनमध्ये प्रवास करता येत नाही.

6 / 10
ही ट्रेन अनेक तीर्थक्षेत्रे आणि पर्यटन स्थळांना भेट देते. ज्यामुळे प्रवाशांना भारताची समृद्ध संस्कृती आणि वैविध्य जवळून अनुभवता येते.

ही ट्रेन अनेक तीर्थक्षेत्रे आणि पर्यटन स्थळांना भेट देते. ज्यामुळे प्रवाशांना भारताची समृद्ध संस्कृती आणि वैविध्य जवळून अनुभवता येते.

7 / 10
ही ट्रेन दिल्लीपासून आपला प्रवास सुरू करते. दिल्लीनंतर तिचा पहिला थांबा अहमदाबाद येथे येतो. त्यानंतर जागृती एक्सप्रेस मुंबई आणि बंगळूरुमधून जात मदुराईला पोहोचते. मदुराईनंतर ती ओडिशाला जाते आणि त्यानंतर मध्य भारतात प्रवेश करते. सर्व महत्त्वाच्या ठिकाणी फिरल्यानंतर, शेवटी ही ट्रेन पुन्हा दिल्लीला परत येते.

ही ट्रेन दिल्लीपासून आपला प्रवास सुरू करते. दिल्लीनंतर तिचा पहिला थांबा अहमदाबाद येथे येतो. त्यानंतर जागृती एक्सप्रेस मुंबई आणि बंगळूरुमधून जात मदुराईला पोहोचते. मदुराईनंतर ती ओडिशाला जाते आणि त्यानंतर मध्य भारतात प्रवेश करते. सर्व महत्त्वाच्या ठिकाणी फिरल्यानंतर, शेवटी ही ट्रेन पुन्हा दिल्लीला परत येते.

8 / 10
जर तुम्ही 2025 मध्ये या ट्रेनमध्ये प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला आताच यासाठी बुकिंग करावी लागेल. यंदा ही ट्रेन 7 नोव्हेंबरला आपला प्रवास सुरू करेल आणि 22 नोव्हेंबरला दिल्लीला परत येईल.

जर तुम्ही 2025 मध्ये या ट्रेनमध्ये प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला आताच यासाठी बुकिंग करावी लागेल. यंदा ही ट्रेन 7 नोव्हेंबरला आपला प्रवास सुरू करेल आणि 22 नोव्हेंबरला दिल्लीला परत येईल.

9 / 10
या ट्रेनमध्ये सीट आरक्षित करण्यासाठी तुम्हाला https://www.jagritiyatra.com/ या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी लागेल. यात तिकीट आणि सीट बुक करण्याची प्रक्रिया किचकट आहे. या वर्षी तिकीट बुक करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर आहे.

या ट्रेनमध्ये सीट आरक्षित करण्यासाठी तुम्हाला https://www.jagritiyatra.com/ या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी लागेल. यात तिकीट आणि सीट बुक करण्याची प्रक्रिया किचकट आहे. या वर्षी तिकीट बुक करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर आहे.

10 / 10
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...