AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त 25 रुपये खर्च करा आणि भारताचा कानाकोपरा फिरा, कसं कुठे, कधी? जाणून घ्या सर्व काही…

जागृती यात्रा ही एक अद्वितीय ट्रेन आहे जी फक्त २५ रुपयांमध्ये संपूर्ण भारताचा प्रवास करण्याची संधी देते. १६ वर्षांपासून चालणारी ही यात्रा उद्योजकतेवर लक्ष केंद्रित करते आणि १५ दिवसांत ८०० किलोमीटरचा प्रवास करते.

| Updated on: Jun 09, 2025 | 5:22 PM
Share
फिरायला जाणं आवडतं नाही, असा माणूस जगात शोधून सापडणार नाही. आपण नेहमीच धकाधकीच्या आयुष्य जगत असतो. त्यामुळे आपल्याला प्रत्येकाला फिरण्याची प्रचंड इच्छा असते. पण फिरायला जायचं म्हटलं की खर्चाचा प्रश्न येतो आणि मग अनेक प्लॅन्स तसेच राहतात.

फिरायला जाणं आवडतं नाही, असा माणूस जगात शोधून सापडणार नाही. आपण नेहमीच धकाधकीच्या आयुष्य जगत असतो. त्यामुळे आपल्याला प्रत्येकाला फिरण्याची प्रचंड इच्छा असते. पण फिरायला जायचं म्हटलं की खर्चाचा प्रश्न येतो आणि मग अनेक प्लॅन्स तसेच राहतात.

1 / 10
पण जर तुम्हाला फक्त २५ रुपयात संपूर्ण भारताचा प्रवास करता आला, तर किती मस्त ना! फिरण्याची आवड असलेल्यांना अशी एक अविश्वसनीय संधी चालून आली आहे.

पण जर तुम्हाला फक्त २५ रुपयात संपूर्ण भारताचा प्रवास करता आला, तर किती मस्त ना! फिरण्याची आवड असलेल्यांना अशी एक अविश्वसनीय संधी चालून आली आहे.

2 / 10
'जागृती यात्रा' नावाची एक विशेष ट्रेन तुम्हाला फक्त 25 रुपयांत संपूर्ण भारताचा प्रवास घडवते. 'उद्योजकतेच्या माध्यमातून भारताचे निर्माण' हे या यात्रेचे मुख्य उद्दिष्ट आहे. गेली 16 वर्षे ही ट्रेन सुरु आहे.

'जागृती यात्रा' नावाची एक विशेष ट्रेन तुम्हाला फक्त 25 रुपयांत संपूर्ण भारताचा प्रवास घडवते. 'उद्योजकतेच्या माध्यमातून भारताचे निर्माण' हे या यात्रेचे मुख्य उद्दिष्ट आहे. गेली 16 वर्षे ही ट्रेन सुरु आहे.

3 / 10
जागृती एक्सप्रेसमध्ये एकावेळी केवळ 500 प्रवाशांना प्रवास करता येतो. ही ट्रेन वर्षातून फक्त एकदाच धावते. त्यामुळे यात प्रवास करण्यासाठी तुम्हाला काही महिने आधी बुकिंग करावी लागते.

जागृती एक्सप्रेसमध्ये एकावेळी केवळ 500 प्रवाशांना प्रवास करता येतो. ही ट्रेन वर्षातून फक्त एकदाच धावते. त्यामुळे यात प्रवास करण्यासाठी तुम्हाला काही महिने आधी बुकिंग करावी लागते.

4 / 10
दरवर्षी मे महिन्यात या ट्रेनचे बुकिंग सुरू होते. नोव्हेंबरमध्ये या यात्रेला सुरुवात होते. जागृती एक्सप्रेस 15 दिवसांत 800 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करते. या प्रवासादरम्यान प्रवाशांना उद्योजकतेचे बारकावे शिकवले जातात, ज्यामुळे हा प्रवास केवळ मनोरंजकच नव्हे तर माहितीपूर्ण देखील ठरतो.

दरवर्षी मे महिन्यात या ट्रेनचे बुकिंग सुरू होते. नोव्हेंबरमध्ये या यात्रेला सुरुवात होते. जागृती एक्सप्रेस 15 दिवसांत 800 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करते. या प्रवासादरम्यान प्रवाशांना उद्योजकतेचे बारकावे शिकवले जातात, ज्यामुळे हा प्रवास केवळ मनोरंजकच नव्हे तर माहितीपूर्ण देखील ठरतो.

5 / 10
या ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी एक महत्त्वाची अट आहे ती म्हणजे तुमचे वय 21 ते 27 वर्षांच्या दरम्यान असणं गरजेचे आहे. या वयोगटाबाहेरील व्यक्तींना या ट्रेनमध्ये प्रवास करता येत नाही.

या ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी एक महत्त्वाची अट आहे ती म्हणजे तुमचे वय 21 ते 27 वर्षांच्या दरम्यान असणं गरजेचे आहे. या वयोगटाबाहेरील व्यक्तींना या ट्रेनमध्ये प्रवास करता येत नाही.

6 / 10
ही ट्रेन अनेक तीर्थक्षेत्रे आणि पर्यटन स्थळांना भेट देते. ज्यामुळे प्रवाशांना भारताची समृद्ध संस्कृती आणि वैविध्य जवळून अनुभवता येते.

ही ट्रेन अनेक तीर्थक्षेत्रे आणि पर्यटन स्थळांना भेट देते. ज्यामुळे प्रवाशांना भारताची समृद्ध संस्कृती आणि वैविध्य जवळून अनुभवता येते.

7 / 10
ही ट्रेन दिल्लीपासून आपला प्रवास सुरू करते. दिल्लीनंतर तिचा पहिला थांबा अहमदाबाद येथे येतो. त्यानंतर जागृती एक्सप्रेस मुंबई आणि बंगळूरुमधून जात मदुराईला पोहोचते. मदुराईनंतर ती ओडिशाला जाते आणि त्यानंतर मध्य भारतात प्रवेश करते. सर्व महत्त्वाच्या ठिकाणी फिरल्यानंतर, शेवटी ही ट्रेन पुन्हा दिल्लीला परत येते.

ही ट्रेन दिल्लीपासून आपला प्रवास सुरू करते. दिल्लीनंतर तिचा पहिला थांबा अहमदाबाद येथे येतो. त्यानंतर जागृती एक्सप्रेस मुंबई आणि बंगळूरुमधून जात मदुराईला पोहोचते. मदुराईनंतर ती ओडिशाला जाते आणि त्यानंतर मध्य भारतात प्रवेश करते. सर्व महत्त्वाच्या ठिकाणी फिरल्यानंतर, शेवटी ही ट्रेन पुन्हा दिल्लीला परत येते.

8 / 10
जर तुम्ही 2025 मध्ये या ट्रेनमध्ये प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला आताच यासाठी बुकिंग करावी लागेल. यंदा ही ट्रेन 7 नोव्हेंबरला आपला प्रवास सुरू करेल आणि 22 नोव्हेंबरला दिल्लीला परत येईल.

जर तुम्ही 2025 मध्ये या ट्रेनमध्ये प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला आताच यासाठी बुकिंग करावी लागेल. यंदा ही ट्रेन 7 नोव्हेंबरला आपला प्रवास सुरू करेल आणि 22 नोव्हेंबरला दिल्लीला परत येईल.

9 / 10
या ट्रेनमध्ये सीट आरक्षित करण्यासाठी तुम्हाला https://www.jagritiyatra.com/ या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी लागेल. यात तिकीट आणि सीट बुक करण्याची प्रक्रिया किचकट आहे. या वर्षी तिकीट बुक करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर आहे.

या ट्रेनमध्ये सीट आरक्षित करण्यासाठी तुम्हाला https://www.jagritiyatra.com/ या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी लागेल. यात तिकीट आणि सीट बुक करण्याची प्रक्रिया किचकट आहे. या वर्षी तिकीट बुक करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर आहे.

10 / 10
Follow Us
उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात; पहा व्हिडीओ
Ramraksha Andolan Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात, पहा व्हिडीओ
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल; शंख नाद अन्...
धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी
kharghar | धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी दुर्घटना
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेता
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेत्यानेच समोर येत सस्पेन्स संपवला!
मोठी बातमी! 130 ज्येष्ठ शिवसैनिक ठाकरेंच्या भेटीला, तासभराच्या बैठकीत
मोठी बातमी! 130 ज्येष्ठ शिवसैनिक ठाकरेंच्या भेटीला, तासभराच्या बैठकीत काय घडलं? मातोश्रीवर घडामोडींना वेग
शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट! कृषीमंत्री माध्यमांसमोरच म्हणाले...
Dattatray Bharne | शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट! कृषीमंत्री माध्यमांसमोरच म्हणाले...
राज्यात मुसळधार पावासाचा आणखी एक बळी, CCTV तून धक्कादायक माहिती समोर
Kurla | राज्यात मुसळधार पावासाचा आणखी एक बळी, CCTV तून धक्कादायक माहिती समोर
काय राहिलंय आता? ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावताच भाजप नेत्याचं ते विधान
काय राहिलंय आता? राहिलेत ते... ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावताच भाजप नेत्याचं ते विधान चर्चेत
मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं...
Thane | मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं वातावरण
पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड
Mumbai | पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड