AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Rain Update : शाळांना सुट्टी आहे की नाही? नेमका निर्णय काय? फडणवीसांनीच संभ्रम संपवला; सगळं सांगितलं!

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात तुफान पाऊस पडतोय. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भासह मुंबईलाही पावसाने झोडपून काढले आहे. मुंबईत तर रस्त्यांवर पाणी तुंबले असून काही रस्ते बंद करण्यात आले आहेत. लोकल सेवा मंदावली असून रस्त्यांवरील ट्रॅफिकही स्लो झाले आहे.

| Updated on: Aug 18, 2025 | 4:05 PM
Share
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात तुफान पाऊस पडतोय. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भासह मुंबईलाही पावसाने झोडपून काढले आहे. मुंबईत तर रस्त्यांवर पाणी तुंबले असून काही रस्ते बंद करण्यात आले आहेत. लोकल सेवा मंदावली असून रस्त्यांवरील ट्रॅफिकही स्लो झाले आहे.

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात तुफान पाऊस पडतोय. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भासह मुंबईलाही पावसाने झोडपून काढले आहे. मुंबईत तर रस्त्यांवर पाणी तुंबले असून काही रस्ते बंद करण्यात आले आहेत. लोकल सेवा मंदावली असून रस्त्यांवरील ट्रॅफिकही स्लो झाले आहे.

1 / 5
दरम्यान, आता मुंबई, उपनगरांत तुफान पाऊस कोसळत असल्याने शाळा, महाविद्यालये बंद असणार की चालू राहणार? असा प्रश्न पालक तसेच विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे. याबाबत आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच माहिती देत संभ्रम संपवला आहे.

दरम्यान, आता मुंबई, उपनगरांत तुफान पाऊस कोसळत असल्याने शाळा, महाविद्यालये बंद असणार की चालू राहणार? असा प्रश्न पालक तसेच विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे. याबाबत आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच माहिती देत संभ्रम संपवला आहे.

2 / 5
मुंबई तसेच संपूर्ण महाराष्ट्रात होत असलेल्या पावसाचा फडणवीस यांनी आढावा घेतला आहे. मुंबईत पुढच्या दहा ते बारा तासांत पावसाचा जोर वाढणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे. तसेच मुंईला रेड अलर्ट देण्यात आल्याचंही त्यांनी नमूद केलं असून नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.

मुंबई तसेच संपूर्ण महाराष्ट्रात होत असलेल्या पावसाचा फडणवीस यांनी आढावा घेतला आहे. मुंबईत पुढच्या दहा ते बारा तासांत पावसाचा जोर वाढणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे. तसेच मुंईला रेड अलर्ट देण्यात आल्याचंही त्यांनी नमूद केलं असून नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.

3 / 5
सध्या मुंबईतील पावसाची स्थिती लक्षात घेता आम्ही मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना लवकर घरी सोडण्याचा आदेश दिला आहे, अशीही माहिती फडणवीस यांनी दिली. तसेच आजच्या पावसाची स्थिती लक्षात घेता दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी देण्याचा आदेश महापालिकेने दिल्याचेही फडणवीसांनी सांगितले.

सध्या मुंबईतील पावसाची स्थिती लक्षात घेता आम्ही मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना लवकर घरी सोडण्याचा आदेश दिला आहे, अशीही माहिती फडणवीस यांनी दिली. तसेच आजच्या पावसाची स्थिती लक्षात घेता दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी देण्याचा आदेश महापालिकेने दिल्याचेही फडणवीसांनी सांगितले.

4 / 5
तसेच, आगामी 10 ते 12 तासांत मुंबईत पावसाचा जोर वाढणार आहे. समुद्रात तीन ते चार मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे संध्याकाळी आलेल्या हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेऊन शाळांना सुट्टी द्यायची की नाही हे ठरवले जाईल. संध्याकाळी मुंबई पालिकेकडून तसे आदेश देण्यात येतील, अशी माहिती फडणवीसांनी दिलेली आहे.

तसेच, आगामी 10 ते 12 तासांत मुंबईत पावसाचा जोर वाढणार आहे. समुद्रात तीन ते चार मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे संध्याकाळी आलेल्या हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेऊन शाळांना सुट्टी द्यायची की नाही हे ठरवले जाईल. संध्याकाळी मुंबई पालिकेकडून तसे आदेश देण्यात येतील, अशी माहिती फडणवीसांनी दिलेली आहे.

5 / 5
Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.