AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND VS SL: भारताविरोधातील पहिल्या विजयासाठी श्रीलंका व्याकूळ, T20 नंतर कसोटी मालिकेतही क्लीन स्वीपची भीती

श्रीलंकेच्या (India vs Sri Lanka Test Record) संघाला नुकत्याच झालेल्या भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेत 3-0 अशा दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. श्रीलंकेला तीनपैकी एकही सामना जिंकता आला नाही.

अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Mar 01, 2022 | 4:36 PM
Share
श्रीलंकेच्या (India vs Sri Lanka Test Record) संघाला नुकत्याच झालेल्या भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेत 3-0 अशा दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. श्रीलंकेला तीनपैकी एकही सामना जिंकता आला नाही. आता मोहालीत 4 मार्चपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. दुसरी कसोटी बंगळुरूमध्ये खेळवली जाणार असून त्यातही विजयाची मोठी दावेदार टीम इंडियाच आहे. पण इथे प्रश्न केवळ विजयाचा नसून विजयाच्या फरकाचा आहे. टीम इंडिया पुन्हा एकदा श्रीलंकेला क्लीन स्वीप देणार की श्रीलंका भारतीय भूमीवर पहिल्यांदाच भारताला हरवणार? याबद्दल सर्वत्र चर्चा सुरु आहेत. भारताविरुद्ध श्रीलंकेचे कसोटीमधले आकडे खूप खराब असल्याने आगामी कसोटी मालिकेतही भारताचच पारडं जड दिसतंय. (PC-AFP)

श्रीलंकेच्या (India vs Sri Lanka Test Record) संघाला नुकत्याच झालेल्या भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेत 3-0 अशा दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. श्रीलंकेला तीनपैकी एकही सामना जिंकता आला नाही. आता मोहालीत 4 मार्चपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. दुसरी कसोटी बंगळुरूमध्ये खेळवली जाणार असून त्यातही विजयाची मोठी दावेदार टीम इंडियाच आहे. पण इथे प्रश्न केवळ विजयाचा नसून विजयाच्या फरकाचा आहे. टीम इंडिया पुन्हा एकदा श्रीलंकेला क्लीन स्वीप देणार की श्रीलंका भारतीय भूमीवर पहिल्यांदाच भारताला हरवणार? याबद्दल सर्वत्र चर्चा सुरु आहेत. भारताविरुद्ध श्रीलंकेचे कसोटीमधले आकडे खूप खराब असल्याने आगामी कसोटी मालिकेतही भारताचच पारडं जड दिसतंय. (PC-AFP)

1 / 5
श्रीलंका आणि भारत यांच्यात आतापर्यंत एकूण 44 कसोटी सामने खेळले गेले आहेत. भारताने त्यातले 20 आणि श्रीलंकेने 7 कसोटी सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर 17 कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत. (PC-AFP)

श्रीलंका आणि भारत यांच्यात आतापर्यंत एकूण 44 कसोटी सामने खेळले गेले आहेत. भारताने त्यातले 20 आणि श्रीलंकेने 7 कसोटी सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर 17 कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत. (PC-AFP)

2 / 5
श्रीलंकेच्या संघाने भारताला कधीही भारतीय भूमीवर पराभूत केलेलं नाही. श्रीलंकेने भारतात 20 कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी 11 सामन्यांमध्ये श्रीलंकेचा पराभव झाला आहे तर 9 कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत. (PC-AFP)

श्रीलंकेच्या संघाने भारताला कधीही भारतीय भूमीवर पराभूत केलेलं नाही. श्रीलंकेने भारतात 20 कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी 11 सामन्यांमध्ये श्रीलंकेचा पराभव झाला आहे तर 9 कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत. (PC-AFP)

3 / 5
श्रीलंकेने भारतात 8 कसोटी मालिका खेळल्या आहेत, ज्यात एकाही मालिकेत पाहुण्या संघाला विजय मिळवता आला नाही. भारताने 6 कसोटी मालिका जिंकल्या आहेत आणि 2 अनिर्णित राहिल्या आहेत. (PC-AFP)

श्रीलंकेने भारतात 8 कसोटी मालिका खेळल्या आहेत, ज्यात एकाही मालिकेत पाहुण्या संघाला विजय मिळवता आला नाही. भारताने 6 कसोटी मालिका जिंकल्या आहेत आणि 2 अनिर्णित राहिल्या आहेत. (PC-AFP)

4 / 5
श्रीलंकेने 2015 साली भारताविरुद्ध शेवटचा कसोटी विजय मिळवला होता. 7 वर्षांपूर्वी श्रीलंकेने गॉलमध्ये भारताचा पराभव केला होता. उभय संघांमधील कसोटी आकडेवारी पाहता आगामी मालिका जिंकणे श्रीलंकेसाठी सोपं नाही.  (PC-AFP)

श्रीलंकेने 2015 साली भारताविरुद्ध शेवटचा कसोटी विजय मिळवला होता. 7 वर्षांपूर्वी श्रीलंकेने गॉलमध्ये भारताचा पराभव केला होता. उभय संघांमधील कसोटी आकडेवारी पाहता आगामी मालिका जिंकणे श्रीलंकेसाठी सोपं नाही. (PC-AFP)

5 / 5
Follow Us
राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही....
Devendra Fadnavis| राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही पळकुटेपणा...
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची...
Sharad Pawar | विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची पंतप्रधान मोदींना थेट विनंती
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं..
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं मोठं विधान
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद,
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद, व्हिडीओ आले समोर
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन; व्हिडिओ व्हायरल
आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
Uddhav Thackeray | आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरे...
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरेंचं विधान तुफान चर्चेत
ठाकरे बंधूंचं ठरलं; 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन मोर्चा
मोठी घोषणा! ठाकरे बंधूंचं ठरलं; 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन मोर्चा
29 वर्षांपूर्वी धर्मेंद्र प्रधानानंवर झाला होता लाठीचार्ज
29 वर्षांपूर्वी धर्मेंद्र प्रधानानंवर झाला होता लाठीचार्ज
हा कुठला सत्तेचा माज? राज ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका
Raj Thackeray | हा कुठला सत्तेचा माज? राज ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका