AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाणी टंचाईने हिंगोलीत गावकरी त्रस्त, पाण्यासाठी कित्येक मैलांची भटकंती..

मराठवाडा येथील हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यात प्रसिद्ध तीर्थस्थळ असूनही या तालुक्यातील संघनाईक तांडा गावाला मात्र सध्या भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

| Updated on: May 08, 2026 | 6:21 PM
Share
औंढा नागनाथ तालुक्यातील संघनाईक तांडा गावातील ग्रामस्थांना कळशा- हंडे घेऊन  राना- वणातून पायपीट  करावी लागत आहे. गावातील तळ गाठलेल्या विहिरींचे पाणी शेंदावे लागत आहे. गावातील लोक टँकरची मागणी करूनही प्रशासन टँकर देत नाही अशी गाऱ्हाणी गावातील रहिवासी करीत आहेत.

औंढा नागनाथ तालुक्यातील संघनाईक तांडा गावातील ग्रामस्थांना कळशा- हंडे घेऊन राना- वणातून पायपीट करावी लागत आहे. गावातील तळ गाठलेल्या विहिरींचे पाणी शेंदावे लागत आहे. गावातील लोक टँकरची मागणी करूनही प्रशासन टँकर देत नाही अशी गाऱ्हाणी गावातील रहिवासी करीत आहेत.

1 / 5
 पाण्यासाठी ग्रामस्थांना दिवसभर उन्हा ताणात  फिरावे लागत आहे.घरात  सात ते आठ माणसे असल्याने चार घागरी पाणी पुरते का?असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत.चार महिने आम्ही ऊस तोडणीसाठी जातो,तिकडून आले की आम्हाला पाणीच भराव लागते. आठ दिवस झाले तरी अजून टँकर आलेला नाही अशी कैफीयत गावकरी करीत आहेत.

पाण्यासाठी ग्रामस्थांना दिवसभर उन्हा ताणात फिरावे लागत आहे.घरात सात ते आठ माणसे असल्याने चार घागरी पाणी पुरते का?असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत.चार महिने आम्ही ऊस तोडणीसाठी जातो,तिकडून आले की आम्हाला पाणीच भराव लागते. आठ दिवस झाले तरी अजून टँकर आलेला नाही अशी कैफीयत गावकरी करीत आहेत.

2 / 5
 पाणी नसल्याने लेकरांचे शिक्षण होत नाही. ऊन मरणाचं लागत आहे. आम्हाला प्यायला देखील पाणी नाही. आम्ही काय करावे ? टँकरची मागणी केली तरी आज उद्या म्हणत दिवस काढत आहेत. काल आम्ही दिवसभर उन्हात टँकरची वाट पाहत बसलो होतो. पण टँकर काय आला नाही. मग आता आम्ही काय करावे असा सवाल गावकरी करत आहेत.

पाणी नसल्याने लेकरांचे शिक्षण होत नाही. ऊन मरणाचं लागत आहे. आम्हाला प्यायला देखील पाणी नाही. आम्ही काय करावे ? टँकरची मागणी केली तरी आज उद्या म्हणत दिवस काढत आहेत. काल आम्ही दिवसभर उन्हात टँकरची वाट पाहत बसलो होतो. पण टँकर काय आला नाही. मग आता आम्ही काय करावे असा सवाल गावकरी करत आहेत.

3 / 5
 गावातील वयोवृद्ध आणि चिमुकल्या लहान मुलांना हातात घागरी घेऊन  गावाच्याबाहेर असलेल्या विहिरीचे पाणी आणण्यासाठी जावे लागत आहेत.आमची मुले नोकरी निमित्त पुण्याला आहेत. आता या वयात आम्हाला पाणी शेंदण होत नाही.मला 60 वर्षे झाली तरी सारी जिंदगी या पाण्यासाठी अशीच चालली आहे. आम्ही दुसरे काही मागत नाही, केवळ पाणी मागत आहोत अशी मागणी गावातील महिलेने केली आहे.

गावातील वयोवृद्ध आणि चिमुकल्या लहान मुलांना हातात घागरी घेऊन गावाच्याबाहेर असलेल्या विहिरीचे पाणी आणण्यासाठी जावे लागत आहेत.आमची मुले नोकरी निमित्त पुण्याला आहेत. आता या वयात आम्हाला पाणी शेंदण होत नाही.मला 60 वर्षे झाली तरी सारी जिंदगी या पाण्यासाठी अशीच चालली आहे. आम्ही दुसरे काही मागत नाही, केवळ पाणी मागत आहोत अशी मागणी गावातील महिलेने केली आहे.

4 / 5
पाणी वाचवण्यासाठी लहान मुलांना  खाटेवर (बाजेवर )बसवून अंघोळ घालावी लागत आहे. खाटेखाली पडणारे अंघोळीचे सांडपाणी टोपल्यात जमा करून इतर कामासाठी वापरत असल्याची प्रतिक्रिया महिलांना दिली आहे. टीव्ही 9 मराठीचे रमेश चेंडके यांनी या गावकऱ्यांशी संवाद साधून या प्रश्नाला वाचा फोडली आहे.

पाणी वाचवण्यासाठी लहान मुलांना खाटेवर (बाजेवर )बसवून अंघोळ घालावी लागत आहे. खाटेखाली पडणारे अंघोळीचे सांडपाणी टोपल्यात जमा करून इतर कामासाठी वापरत असल्याची प्रतिक्रिया महिलांना दिली आहे. टीव्ही 9 मराठीचे रमेश चेंडके यांनी या गावकऱ्यांशी संवाद साधून या प्रश्नाला वाचा फोडली आहे.

5 / 5
Follow Us
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग.....
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग......
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री.
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?.
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?.
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?.
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी.
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा..
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा...
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट....
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट.....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय.....
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के.