AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचे शेवटचे रेल्वे स्टेशन कुठले ? कधीकाळी सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधीजी यांच्या पदस्पर्शाने झाले होते पावन

| Updated on: May 23, 2025 | 5:19 AM
Share
भारताचे शेवटचे रेल्वे स्थानक सिंहाबाद आहे. हे स्थानक पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील हबीबपुर भागात भारत आणि बांग्लादेश सीमेवर वसलेले आहे. या स्थानकानंतर हा रेल्वे मार्ग बांगलादेशाच्या सीमेत प्रवेश करतो. त्यामुळे सिंहाबाद भारताच्या सीमेवर वसलेले अनोखे स्थानक आहे. देशाचा रेल्वे इतिहास आणि शेजारील राष्ट्राशी असलेल्या व्यापारी संबंधाचे हे स्थानक प्रतिक आहे.

भारताचे शेवटचे रेल्वे स्थानक सिंहाबाद आहे. हे स्थानक पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील हबीबपुर भागात भारत आणि बांग्लादेश सीमेवर वसलेले आहे. या स्थानकानंतर हा रेल्वे मार्ग बांगलादेशाच्या सीमेत प्रवेश करतो. त्यामुळे सिंहाबाद भारताच्या सीमेवर वसलेले अनोखे स्थानक आहे. देशाचा रेल्वे इतिहास आणि शेजारील राष्ट्राशी असलेल्या व्यापारी संबंधाचे हे स्थानक प्रतिक आहे.

1 / 7
सिंहाबाद रेल्वे स्टेशन ब्रिटिश काळातले आहे. आधी ते कोलकाता आणि ढाका रेल्वे मार्गाचा महत्वाचा थांबा होते.  नेताजी सुभाष चंद्र बोस आणि महात्मा गांधी सारख्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वांनी या स्टेशनादरम्यान प्रवास केलेला आहे.परंतू 1971 मध्ये बांगलादेशाच्या निर्मितीनंतर या स्थानकाचा रोल बदलला.आधी या स्थानकातून मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या प्रवास करायची. तर 1978 मध्ये झालेल्या करारानुसार येथे मालगाड्यांचे ट्रान्झिस्ट पॉईंट बनला. आणि 2011 नंतर नेपाळसाठीही येथून वाहतूक सुरु झाली.

सिंहाबाद रेल्वे स्टेशन ब्रिटिश काळातले आहे. आधी ते कोलकाता आणि ढाका रेल्वे मार्गाचा महत्वाचा थांबा होते. नेताजी सुभाष चंद्र बोस आणि महात्मा गांधी सारख्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वांनी या स्टेशनादरम्यान प्रवास केलेला आहे.परंतू 1971 मध्ये बांगलादेशाच्या निर्मितीनंतर या स्थानकाचा रोल बदलला.आधी या स्थानकातून मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या प्रवास करायची. तर 1978 मध्ये झालेल्या करारानुसार येथे मालगाड्यांचे ट्रान्झिस्ट पॉईंट बनला. आणि 2011 नंतर नेपाळसाठीही येथून वाहतूक सुरु झाली.

2 / 7
आजकाल सिंहाबाद स्थानकावर प्रवासी ट्रेन थांबत नाही.याचा वापर केवळ मालगाडीसाठी एक ट्रान्झिस्ट पॉईंटच्या रुपात होत आहे. 2011 मध्ये भारत आणि बांगलादेशातील करारानुसार मालवाहतूकीचे मोठे जंक्शन बनले.स्टेशनची ब्रिटीशकालिन वसाहती रचना आणि जुनी उपकरणे अजूनही आपल्याला भूतकाळाची आठवण करून देतात, परंतु आता ते एक शांत स्मारक बनले आहे.

आजकाल सिंहाबाद स्थानकावर प्रवासी ट्रेन थांबत नाही.याचा वापर केवळ मालगाडीसाठी एक ट्रान्झिस्ट पॉईंटच्या रुपात होत आहे. 2011 मध्ये भारत आणि बांगलादेशातील करारानुसार मालवाहतूकीचे मोठे जंक्शन बनले.स्टेशनची ब्रिटीशकालिन वसाहती रचना आणि जुनी उपकरणे अजूनही आपल्याला भूतकाळाची आठवण करून देतात, परंतु आता ते एक शांत स्मारक बनले आहे.

3 / 7
जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला रेल्वे स्टेशन हे भारताचे सर्वात उत्तर टोकाचे शेवटचे रेल्वे स्टेशन आहे. हा जम्मू-बारामुल्ला रेल्वे मार्गाचा हा एक भाग आहे ज्यामुळे काश्मीर खोरे देशाच्या उर्वरित भागाशी जोडले जात.. एवढेच नव्हे तर हे स्टेशन धोरणात्मक आणि पर्यटन दोन्ही दृष्टिकोनातून महत्त्वाचे स्थानक आहे. काश्मीर खोऱ्यातील सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक या रेल्वे मार्गाचा वापर करतात. जम्मू आणि काश्मीरला रेल्वे नेटवर्कशी जोडण्याचा हा प्रकल्प अत्यंत आव्हानात्मक होता. या मार्गावर अनेक बोगदे आणि पूल आहेत. भारताच्या अद्भुत अभियांत्रिकीचा हा सर्वोत्तम नमुना आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला रेल्वे स्टेशन हे भारताचे सर्वात उत्तर टोकाचे शेवटचे रेल्वे स्टेशन आहे. हा जम्मू-बारामुल्ला रेल्वे मार्गाचा हा एक भाग आहे ज्यामुळे काश्मीर खोरे देशाच्या उर्वरित भागाशी जोडले जात.. एवढेच नव्हे तर हे स्टेशन धोरणात्मक आणि पर्यटन दोन्ही दृष्टिकोनातून महत्त्वाचे स्थानक आहे. काश्मीर खोऱ्यातील सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक या रेल्वे मार्गाचा वापर करतात. जम्मू आणि काश्मीरला रेल्वे नेटवर्कशी जोडण्याचा हा प्रकल्प अत्यंत आव्हानात्मक होता. या मार्गावर अनेक बोगदे आणि पूल आहेत. भारताच्या अद्भुत अभियांत्रिकीचा हा सर्वोत्तम नमुना आहे.

4 / 7
आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील लिडो रेल्वे स्टेशन हे भारताच्या  पूर्वेकडील शेवटचे रेल्वे स्टेशन आहे. हे स्थानक लुमडिंग-दिब्रुगड रेल्वे नेटवर्कवर आहे. लिडो स्थानक एकेकाळी स्टिलवेल रोडचे (१९४२-४५ मध्ये बांधलेले) बर्मा आणि चीनला जोडणारे ) प्रारंभ बिंदूचे स्थानक होते. पूर्वी हे स्थानक लेखापाणी स्थानकाजवळ होते, परंतु १९९७ मध्ये त्याचे गेज रूपांतरण झाल्याने लेडो हे पूर्व सीमेवरील शेवटचे रेल्वे स्टेशन बनले. हे स्टेशन कोळसा वाहतुकीसाठी देखील महत्त्वाचे राहिले आहे.

आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील लिडो रेल्वे स्टेशन हे भारताच्या पूर्वेकडील शेवटचे रेल्वे स्टेशन आहे. हे स्थानक लुमडिंग-दिब्रुगड रेल्वे नेटवर्कवर आहे. लिडो स्थानक एकेकाळी स्टिलवेल रोडचे (१९४२-४५ मध्ये बांधलेले) बर्मा आणि चीनला जोडणारे ) प्रारंभ बिंदूचे स्थानक होते. पूर्वी हे स्थानक लेखापाणी स्थानकाजवळ होते, परंतु १९९७ मध्ये त्याचे गेज रूपांतरण झाल्याने लेडो हे पूर्व सीमेवरील शेवटचे रेल्वे स्टेशन बनले. हे स्टेशन कोळसा वाहतुकीसाठी देखील महत्त्वाचे राहिले आहे.

5 / 7
 गुजराजच्या कच्छ जिल्ह्यातील नलिया रेल्वे स्टेशन हे भारताच्या  पश्चिम भागातील शेवटचे रेल्वे स्टेशन आहे. हे रेल्वे स्थानक  कच्छच्या दुर्गम भागांना जोडते आणि धोरणात्मक दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहे. नालियाजवळ भारतीय हवाई दलाचा एक हवाई तळ देखील आहे, जो संरक्षण दृष्टिकोनातून खूपच महत्वाचा आहे.

गुजराजच्या कच्छ जिल्ह्यातील नलिया रेल्वे स्टेशन हे भारताच्या पश्चिम भागातील शेवटचे रेल्वे स्टेशन आहे. हे रेल्वे स्थानक कच्छच्या दुर्गम भागांना जोडते आणि धोरणात्मक दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहे. नालियाजवळ भारतीय हवाई दलाचा एक हवाई तळ देखील आहे, जो संरक्षण दृष्टिकोनातून खूपच महत्वाचा आहे.

6 / 7
तामिळनाडूतील 'कन्याकुमारी रेल्वे स्टेशन' हे भारताच्या दक्षिणेकडील शेवटचे रेल्वे स्टेशन आहे. हे स्थानक हिंद महासागराच्या किनाऱ्यावर वसले आहे. येथे हिंद महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र  एकत्र येतात. कन्याकुमारी मंदिर, विवेकानंद रॉक मेमोरियल आणि तिरुवल्लुवर पुतळा यासारखी आकर्षणे जवळ असल्याने हे स्थानक पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. हे स्थानक विवेक एक्सप्रेस सारख्या लांबपल्ल्याच्या गाड्यांसाठी शेवटचा थांबा आहे.ही एक्सप्रेस दिब्रुगडपासून सुरू होते आणि कन्याकुमारीपर्यंत पोहोचते.

तामिळनाडूतील 'कन्याकुमारी रेल्वे स्टेशन' हे भारताच्या दक्षिणेकडील शेवटचे रेल्वे स्टेशन आहे. हे स्थानक हिंद महासागराच्या किनाऱ्यावर वसले आहे. येथे हिंद महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र एकत्र येतात. कन्याकुमारी मंदिर, विवेकानंद रॉक मेमोरियल आणि तिरुवल्लुवर पुतळा यासारखी आकर्षणे जवळ असल्याने हे स्थानक पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. हे स्थानक विवेक एक्सप्रेस सारख्या लांबपल्ल्याच्या गाड्यांसाठी शेवटचा थांबा आहे.ही एक्सप्रेस दिब्रुगडपासून सुरू होते आणि कन्याकुमारीपर्यंत पोहोचते.

7 / 7
Follow Us
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्रा
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्राल...
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यान
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यानं सांगितलं मोठं गुपित
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआ
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआधीच...मोठी अपडेट समोर!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा! 1 एप्रिल 2021 पासून...
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं विधान वादाच्या भोवऱ्यात, काय निर्णय घेणार?
संजय पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार
Shivsena | संजय दिना पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार दाखल
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या कॅफेतील CCTVतून हादरवणार खुलासे
बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव
मोठी बातमी! बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव फसला, पती आणि सासू अटकेत
सत्ता डोक्यात गेलीय! संजय पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात
Sushma Andhare | सत्ता डोक्यात गेलीय! संजय दिना पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात; फडणवीसांनाही केला थेट सवाल
दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10
Venezuela | दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10 हजारांच्या पार जाण्याची भीती!