AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील या रेल्वे स्टेशनवरून थेट विदेशात जाण्यासाठी मिळते ट्रेन, एका देशात जाण्यास बंदी

भारताच्या आसपास छोटे देश आहेत. त्यामुळे या देशात जाण्यासाठी थेट ट्रेन धावतात. सीमेपार प्रवास, व्यापार आणि सांस्कृतिक देवाणघेवाण होते. भारताची नेपाळ, पाकिस्तान आणि बांग्लादेश सारख्या देशांसोबत रेल कनेक्टिविटी आहे.

| Updated on: Jul 01, 2026 | 9:13 PM
Share
भारतात रेल्वेचं मोठं जाळं आहे. सर्व सामन्य नागरिक रेल्वेने प्रवास करणं पसंत करतात. स्वस्त, सुरक्षित असल्याने नागरिकांची रेल्वेने प्रवासाला पसंती असते. देशांतर्गत प्रवासासोबत भारतीय रेल्वे परदेशातही जाते. परदेशात म्हणजे देशाच्या सीमेला लागून असलेल्या देशात.. यात नेपाळ, बांग्लादेश आणि पाकिस्तान हे देश आहेत.

भारतात रेल्वेचं मोठं जाळं आहे. सर्व सामन्य नागरिक रेल्वेने प्रवास करणं पसंत करतात. स्वस्त, सुरक्षित असल्याने नागरिकांची रेल्वेने प्रवासाला पसंती असते. देशांतर्गत प्रवासासोबत भारतीय रेल्वे परदेशातही जाते. परदेशात म्हणजे देशाच्या सीमेला लागून असलेल्या देशात.. यात नेपाळ, बांग्लादेश आणि पाकिस्तान हे देश आहेत.

1 / 6
भारताच्या जयनगर रेल्वे स्थानकातून नेपाळसाठी ट्रेन जातात. भारताच्या मधुबनी जिल्ह्यातील शेवटचं स्टेशन आहे. येथून नेपाळच्या जनकपूरला जाण्यासाठी ट्रेन मिळते. नेपाळ स्टेशन भारतीय स्टेशनच्या सीमाभिंतीच्या बाहेर आहे आणि तिथे पोहोचण्यासाठी एक उड्डाणपूल आहे. या स्टेशनवर चेक-इन केल्यानंतर, प्रवासी थेट नेपाळला जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये चढू शकतात.

भारताच्या जयनगर रेल्वे स्थानकातून नेपाळसाठी ट्रेन जातात. भारताच्या मधुबनी जिल्ह्यातील शेवटचं स्टेशन आहे. येथून नेपाळच्या जनकपूरला जाण्यासाठी ट्रेन मिळते. नेपाळ स्टेशन भारतीय स्टेशनच्या सीमाभिंतीच्या बाहेर आहे आणि तिथे पोहोचण्यासाठी एक उड्डाणपूल आहे. या स्टेशनवर चेक-इन केल्यानंतर, प्रवासी थेट नेपाळला जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये चढू शकतात.

2 / 6
बिहार-नेपाळ सीमेजवळ असलेले रक्सौल जंक्शन, नेपाळला प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक प्रमुख थांबा मानले जाते. हे नेपाळचे मुख्य प्रवेशद्वार म्हणूनही ओळखले जाते. भारताच्या विविध भागांना नेपाळशी जोडणाऱ्या रेल्वेगाड्या येथून सुटतात.

बिहार-नेपाळ सीमेजवळ असलेले रक्सौल जंक्शन, नेपाळला प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक प्रमुख थांबा मानले जाते. हे नेपाळचे मुख्य प्रवेशद्वार म्हणूनही ओळखले जाते. भारताच्या विविध भागांना नेपाळशी जोडणाऱ्या रेल्वेगाड्या येथून सुटतात.

3 / 6
पश्चिम बंगालमधील पेट्रापोल रेल्वे स्टेशन हे भारत-बांग्लादेश सीमेवरील एक प्रमुख वाहतूक केंद्र आहे. ब्रिटिश काळात बांधलेले हे स्टेशन, बांगलादेशातील खुलना शहराशी ब्रॉडगेज मार्गाने जोडलेले आहे. येथून बंधन एक्सप्रेस धावते. मात्र, प्रवासासाठी पासपोर्ट आणि व्हिसा आवश्यक आहे.

पश्चिम बंगालमधील पेट्रापोल रेल्वे स्टेशन हे भारत-बांग्लादेश सीमेवरील एक प्रमुख वाहतूक केंद्र आहे. ब्रिटिश काळात बांधलेले हे स्टेशन, बांगलादेशातील खुलना शहराशी ब्रॉडगेज मार्गाने जोडलेले आहे. येथून बंधन एक्सप्रेस धावते. मात्र, प्रवासासाठी पासपोर्ट आणि व्हिसा आवश्यक आहे.

4 / 6
पश्चिम बंगालमधील उत्तर दिनाजपूर येथे असलेले राधिकापूर रेल्वे स्टेशन, भारत-बांगलादेश रेल्वे वाहतुकीचे एक प्रमुख केंद्र आहे. दोन्ही देशांदरम्यान मालगाड्या आणि प्रवासी गाड्या धावतात. हे स्टेशन एक सीमा तपासणी नाका म्हणूनही काम करते. हल्दीबारी रेल्वे स्टेशन बांगलादेश सीमेपासून फक्त 4 किलोमीटर अंतरावर आहे. चिलाहटी स्टेशनमार्गे दोन्ही देश जोडलेले आहेत. भारतातून ढाक्याला येणाऱ्या रेल्वेगाड्या याच मार्गाने येतात आणि लोक व्यापार व प्रवासासाठी याचा वापर करतात.

पश्चिम बंगालमधील उत्तर दिनाजपूर येथे असलेले राधिकापूर रेल्वे स्टेशन, भारत-बांगलादेश रेल्वे वाहतुकीचे एक प्रमुख केंद्र आहे. दोन्ही देशांदरम्यान मालगाड्या आणि प्रवासी गाड्या धावतात. हे स्टेशन एक सीमा तपासणी नाका म्हणूनही काम करते. हल्दीबारी रेल्वे स्टेशन बांगलादेश सीमेपासून फक्त 4 किलोमीटर अंतरावर आहे. चिलाहटी स्टेशनमार्गे दोन्ही देश जोडलेले आहेत. भारतातून ढाक्याला येणाऱ्या रेल्वेगाड्या याच मार्गाने येतात आणि लोक व्यापार व प्रवासासाठी याचा वापर करतात.

5 / 6
अटारी हे भारत-पाकिस्तान रेल्वे नेटवर्कवरील सर्वात मोठे आणि महत्त्वाचे स्थानक आहे. पूर्वी या मार्गावर भारतातील अटारी ते पाकिस्तानातील लाहोरपर्यंत समझौता एक्सप्रेस धावत असे. हे स्थानक भारत-पाकिस्तान सीमेच्या अगदी जवळ असून  पाकिस्तानात जाण्याचे मुख्य प्रवेशद्वार मानले जाते. पण आता भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध मोडले आहेत. त्यामुळे ही ट्रेन आता बंद आहे. (सर्व फोटो: TV9 नेटकवर्क हिंदीवरून)

अटारी हे भारत-पाकिस्तान रेल्वे नेटवर्कवरील सर्वात मोठे आणि महत्त्वाचे स्थानक आहे. पूर्वी या मार्गावर भारतातील अटारी ते पाकिस्तानातील लाहोरपर्यंत समझौता एक्सप्रेस धावत असे. हे स्थानक भारत-पाकिस्तान सीमेच्या अगदी जवळ असून पाकिस्तानात जाण्याचे मुख्य प्रवेशद्वार मानले जाते. पण आता भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध मोडले आहेत. त्यामुळे ही ट्रेन आता बंद आहे. (सर्व फोटो: TV9 नेटकवर्क हिंदीवरून)

6 / 6
Follow Us
CJP कार्यकर्त्यांना ग्रामस्थांकडून मारहाण; अभिजीत दिपकेंचं मोठं विधान
CJP कार्यकर्त्यांना ग्रामस्थांकडून मारहाण; अभिजीत दिपके यांचं सर्वात मोठं विधान
CJP जखमी विद्यार्थ्यासाठी राहुल गांधींचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या...
CJP च्या जखमी विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधींचा संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या; जोपर्यंत...
राहुल गांधींच्या कार्यक्रमात गर्दी करण्यासाठी 25 हजार...
एकच खळबळ! राहुल गांधींच्या कार्यक्रमात गर्दी करण्यासाठी 25 हजार... व्हायरल ऑडियो क्लिपमध्ये नेमकं काय?
तुम्ही पाहिलं का? राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यासाठी रोहित पवारांकडून...
तुम्ही पाहिलं का? राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यासाठी रोहित पवारांकडून जोरदार बॅनरबाजी
श्वेता तिवारीचा थेट राज ठाकरेंना सवाल; मराठी माणूस म्हणजे फक्त..
श्वेता तिवारीचा थेट राज ठाकरेंना सवाल; मराठी माणूस म्हणजे फक्त..
अजित पवारांच्या अपघाताबाबतचा अजब दावा केल्यानंतर इस्कॉन...
अजित पवारांच्या अपघाताबाबतचा अजब दावा केल्यानंतर...  इस्कॉनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; 'शिवतीर्था'वरील बैठकीत...
संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; 'शिवतीर्था'वरील बैठकीत... नेमकं काय घडलं?
आम्ही भारतीयच, आम्हाला चायनीज नका म्हणू; अरुणाचल प्रदेशमधील चिमुकली...
आम्ही भारतीयच, आम्हाला चायनीज नका म्हणू; अरुणाचल प्रदेशमधील चिमुकलीचा भावनिक व्हिडीओ व्हायरल
दिल्लीत हालचाली वाढल्या! पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली तिसरी बैठक
दिल्लीत हालचाली वाढल्या! पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली तिसरी उच्चस्तरीय बैठक, देशाच्या प्रशासकीय यंत्रणेला...
महाराष्ट्रातील सहकारी बँकांचं अस्तित्त्वच... बड्या नेत्याचा थेट...
महाराष्ट्रातील सहकारी बँकांचं अस्तित्त्वच... बड्या नेत्याचा थेट अमित शहांवर हल्लाबोल, गुजरातमधील...