AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘झी मराठी अवॉर्ड्स 2024’मधील त्या पुरस्काराने कलाकारांचेही डोळे पाणावले

या सोहळ्याचे निवेदक संकर्षण आणि मृण्मयी यांनी सर्व कलाकारांसोबत सेल्फी घेत या जुन्या आठवणींना कॅमेरात बंदिस्त केलं. हा अविस्मरणीय सोहळा येत्या 26 आणि 27 ऑक्टोबरला संध्याकाळी 7 वाजता झी मराठी वाहिनीवर पाहता येईल.

| Updated on: Oct 25, 2024 | 1:03 PM
Share
यंदाचा ‘झी मराठी अवॉर्ड 2024’ खऱ्या अर्थाने संस्मरणीय असणार आहे, कारण झी मराठी यंदा २५ वर्ष पूर्ण करत आहे. या कार्यक्रमात धमाकेदार परफॉर्मन्स असणार आहेतच, पण सोबत हृदयस्पर्शी आठवणींचा देखील समावेश असणार आहे. कार्यक्रम ऐन रंगात असताना घोषणा झाली ती एका अशा पुरस्काराची ज्याने उपस्थित कलाकारांचे डोळे पाणावले.

यंदाचा ‘झी मराठी अवॉर्ड 2024’ खऱ्या अर्थाने संस्मरणीय असणार आहे, कारण झी मराठी यंदा २५ वर्ष पूर्ण करत आहे. या कार्यक्रमात धमाकेदार परफॉर्मन्स असणार आहेतच, पण सोबत हृदयस्पर्शी आठवणींचा देखील समावेश असणार आहे. कार्यक्रम ऐन रंगात असताना घोषणा झाली ती एका अशा पुरस्काराची ज्याने उपस्थित कलाकारांचे डोळे पाणावले.

1 / 5
हा सन्मान कोणा व्यक्तीचा नसून तो एका मालिकेचा होता. ही तीच मालिका आहे जिच्या कलाकारांच्या आणि तंत्रज्ञांच्या यादीवर नजर टाकली तरी त्या मालिकेची श्रीमंती कळते. रात्री आठ वाजले रे वाजले की या मालिकेचं शीर्षकगीत घराघरातून कानावर पडायचं.

हा सन्मान कोणा व्यक्तीचा नसून तो एका मालिकेचा होता. ही तीच मालिका आहे जिच्या कलाकारांच्या आणि तंत्रज्ञांच्या यादीवर नजर टाकली तरी त्या मालिकेची श्रीमंती कळते. रात्री आठ वाजले रे वाजले की या मालिकेचं शीर्षकगीत घराघरातून कानावर पडायचं.

2 / 5
संध्याकाळी फक्त हिंदी मालिका लागायच्या अशा काळात ज्यांनी मराठीचा झेंडा रोवला आणि सगळ्यांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं, जिच्यावर लोकांनी अक्षरश: आभाळासारखी माया केली, ती मराठी खाजगी वाहिनीवरील पहिली मालिका म्हणजेच 'आभाळमाया'.

संध्याकाळी फक्त हिंदी मालिका लागायच्या अशा काळात ज्यांनी मराठीचा झेंडा रोवला आणि सगळ्यांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं, जिच्यावर लोकांनी अक्षरश: आभाळासारखी माया केली, ती मराठी खाजगी वाहिनीवरील पहिली मालिका म्हणजेच 'आभाळमाया'.

3 / 5
झी मराठी प्रमाणेच 'आभाळमाया' या मालिकेलाही पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत. यावेळी मालिकेची संपूर्ण टीम म्हणजेच सुकन्या कुलकर्णी – मोने , मनोज जोशी, सुबोध भावे, मुक्ता बर्वे, हर्षदा खानविलकर, मनवा नाईक, संजय मोने, उदय सबनीस, अरुण नलावडे, उमेश कामत, सोनाली खरे, राहुल मेहेंदळे, वैजयंती आपटे, मुक्ता बर्वे, प्रिया बापट, लेखक विवेक आपटे, दिग्दर्शक मंदार देवस्थळी, निर्माते अच्युत वाझे आणि सुबोध गाडगीळ मंचावर उपस्थित होते.

झी मराठी प्रमाणेच 'आभाळमाया' या मालिकेलाही पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत. यावेळी मालिकेची संपूर्ण टीम म्हणजेच सुकन्या कुलकर्णी – मोने , मनोज जोशी, सुबोध भावे, मुक्ता बर्वे, हर्षदा खानविलकर, मनवा नाईक, संजय मोने, उदय सबनीस, अरुण नलावडे, उमेश कामत, सोनाली खरे, राहुल मेहेंदळे, वैजयंती आपटे, मुक्ता बर्वे, प्रिया बापट, लेखक विवेक आपटे, दिग्दर्शक मंदार देवस्थळी, निर्माते अच्युत वाझे आणि सुबोध गाडगीळ मंचावर उपस्थित होते.

4 / 5
हा पुरस्कार घेताना सुकन्या मोने यांनी विनय आपटे आणि शुभांगी जोशी यांच्याशी असलेल्या नातेसंबंधांना उजाळा दिला. मालिकेचं शूटिंग म्हटलं की किस्से नाहीत असं होतच नाही. संजय मोने यांनी किस्से सांगायला सुरुवात केल्यावर संपूर्ण सभागृहात एकच हशा पिकला.

हा पुरस्कार घेताना सुकन्या मोने यांनी विनय आपटे आणि शुभांगी जोशी यांच्याशी असलेल्या नातेसंबंधांना उजाळा दिला. मालिकेचं शूटिंग म्हटलं की किस्से नाहीत असं होतच नाही. संजय मोने यांनी किस्से सांगायला सुरुवात केल्यावर संपूर्ण सभागृहात एकच हशा पिकला.

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.