AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपमध्ये गेलेले नेते अस्वस्थ, ते परत जाऊ नये म्हणून सरकार पडणार असल्याची वक्तव्य सुरु, पृथ्वीराज चव्हाणांची टीका

महाविकास आघाडी सरकारनं एक वर्ष पूर्ण केले ही मोठी उपलब्धी असल्याचं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. Prithviraj Chavan criticize BJP leaders

भाजपमध्ये गेलेले नेते अस्वस्थ, ते परत जाऊ नये म्हणून सरकार पडणार असल्याची वक्तव्य सुरु, पृथ्वीराज चव्हाणांची टीका
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Nov 27, 2020 | 7:21 PM
Share

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सलग 15 वर्ष सरकार चालवले. आताचे सरकार महाविकास आघाडीचे सरकार आहे. शिवसेनेसोबत आम्ही यापूर्वी काम केले नव्हते. जवळपास तिन्ही पक्षांची सदस्य संख्या सारखी होती. अनेकांना या सरकारच्या भवितव्याबाबत शंका होती. एक वर्ष सरकार टिकलं हे मोठी उपलब्धी असल्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी टीव्ही 9 मराठीशी महाविकास आघाडी सरकारच्या वर्षूपर्तीनिमित्त बोलत होते. (Prithviraj Chavan criticize BJP leaders)

महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना एक हेतू होता. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते भाजपमध्ये गेले होती. भाजप आणि शिवसेनेचे सरकार येईल म्हणून अनेक नेते भाजपात गेले होते. आता पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादीत प्रवेश सुरु झाले आहेत. भाजपची सत्ता नसल्यामुळं काही नेते अस्वस्थ झाले आहेत. ते परत माघारी जाऊ नये म्हणून सरकार पडेल, असं सांगण्यात येते. (Prithviraj Chavan criticize BJP leaders)

मोदी सरकारवर टीका

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र असल्यामुळे सरकारचा पाया भक्कम आहे. तीन पक्ष मिळून जो निर्णय होईल तो आमचा निर्णय असतो. देशाची अर्थव्यवस्था कोलमडत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी कलम 370, राम मंदिर, नागरिकत्व दुरस्ती कायदा इतर विषयांना प्राधान्य देत आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेकडे मोदी सरकारचे दुर्लक्ष झालेले आहे. त्यांच्याकडे अर्थव्यवस्थेवर मार्ग काढण्यासाठी उपाय नाहीत. (Prithviraj Chavan criticize BJP leaders)

केंद्र सरकारला कोरोनामध्ये यश मिळालेले नाही. आयसीएमआरच्या अध्यक्षांनी कोरोना लसी बाबत महिनभरात लसीच्या चाचण्या पूर्ण करण्याबाबतचे पत्र लिहिले होते. पंतप्रधानांना 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरुन घोषणा करण्यासाठी पत्र लिहिले गेले होते. आयसीएमआरच्या अध्यक्षांना अजूनही पदावरुन हटवण्यात आलेले नाही. नरेंद्र मोदी सरकारला चीनचं आक्रमण रोखण्यात अपयश आल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

कंगना रणौत, अर्णव गोस्वामी, सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेशी संबंध नाही. देशाच्या ढासळलेल्या अर्थव्यवस्थेवरुन लक्ष हटवण्यासाठी कंगना रणौत, अर्णव गोस्वामी सारखे मुद्दे पुढे आणले जातात, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी LIVE https://t.co/WU0VDpxeBn

संबंधित बातम्या:

Prithviraj Chavan | मविआची वर्षपूर्ती , माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण LIVE

तुम्ही फडणवीसांना घाबरता का? पृथ्वीराज चव्हाण म्हणतात….

गेल्या 10 वर्षापासूनच्या संपत्तीचे विवरण द्या, पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाची नोटीस

(Prithviraj Chavan criticize BJP leaders)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...