AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

3 महिन्यात 4 कॅप्टन बदलले, तरीही टीम इंडियाचा विजयरथ सुस्साट

राहुल द्रविडने टीम इंडियाच्या प्रक्षिकपदाची धुरा हाती घेतली आहे. तीन महिन्यांपासून तो संघांसोबत आहे. या तीन महिन्यात 4 मालिकांमध्ये भारतीय संघाने चार कर्णधार बदलले. पण, या सगळ्यात एक गोष्ट चांगली आणि कॉमन आहे ती म्हणजे टीम इंडियाचा विजय.

| Edited By: | Updated on: Jan 01, 2022 | 2:09 PM
Share
राहुल द्रविडने टीम इंडियाच्या प्रक्षिकपदाची धुरा हाती घेतली आहे. तीन महिन्यांपासून तो संघांसोबत आहे. या तीन महिन्यात 4 मालिकांमध्ये भारतीय संघाने चार कर्णधार बदलले. पण, या सगळ्यात एक गोष्ट चांगली आणि कॉमन आहे ती म्हणजे टीम इंडियाचा विजय.

राहुल द्रविडने टीम इंडियाच्या प्रक्षिकपदाची धुरा हाती घेतली आहे. तीन महिन्यांपासून तो संघांसोबत आहे. या तीन महिन्यात 4 मालिकांमध्ये भारतीय संघाने चार कर्णधार बदलले. पण, या सगळ्यात एक गोष्ट चांगली आणि कॉमन आहे ती म्हणजे टीम इंडियाचा विजय.

1 / 5
राहुल द्रविडने न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या घरच्या टी-20 मालिकेतून टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली. या मालिकेत रोहित शर्मा कर्णधार होता. भारताने ही मालिका सहज जिंकली.

राहुल द्रविडने न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या घरच्या टी-20 मालिकेतून टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली. या मालिकेत रोहित शर्मा कर्णधार होता. भारताने ही मालिका सहज जिंकली.

2 / 5
न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर कसोटी मालिका सुरू झाली तेव्हा 2 सामन्यांत 2 कर्णधार दिसले. कानपूरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत विराट कोहली उपलब्ध नसल्याने अजिंक्य रहाणेने कर्णधारपद भूषवले होते. आणि जेव्हा विराट कोहली मुंबईतील दुसऱ्या कसोटीसाठी परतला तेव्हा त्याने कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतली. न्यूझीलंडविरुद्धची ही कसोटी मालिकाही भारताने जिंकली.

न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर कसोटी मालिका सुरू झाली तेव्हा 2 सामन्यांत 2 कर्णधार दिसले. कानपूरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत विराट कोहली उपलब्ध नसल्याने अजिंक्य रहाणेने कर्णधारपद भूषवले होते. आणि जेव्हा विराट कोहली मुंबईतील दुसऱ्या कसोटीसाठी परतला तेव्हा त्याने कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतली. न्यूझीलंडविरुद्धची ही कसोटी मालिकाही भारताने जिंकली.

3 / 5
भारताचा कसोटी संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. सेंच्युरियन म्हणजेच दक्षिण आफ्रिकेचा अभेद्य किल्ला जिंकून भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडीही घेतली आहे. विराट कोहली या मालिकेतही भारतीय कर्णधार आहे आणि तो इतिहास रचण्याच्या जवळ आहे. कारण त्याच्याकडे दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकणारा पहिला भारतीय कर्णधार बनण्याची सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे हे राहुल द्रविडच्या कोचिंगमध्ये होईल. स्वतः द्रविड दक्षिण आफ्रिकेत पहिली कसोटी जिंकणारा भारतीय कर्णधार आहे.

भारताचा कसोटी संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. सेंच्युरियन म्हणजेच दक्षिण आफ्रिकेचा अभेद्य किल्ला जिंकून भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडीही घेतली आहे. विराट कोहली या मालिकेतही भारतीय कर्णधार आहे आणि तो इतिहास रचण्याच्या जवळ आहे. कारण त्याच्याकडे दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकणारा पहिला भारतीय कर्णधार बनण्याची सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे हे राहुल द्रविडच्या कोचिंगमध्ये होईल. स्वतः द्रविड दक्षिण आफ्रिकेत पहिली कसोटी जिंकणारा भारतीय कर्णधार आहे.

4 / 5
दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेनंतर उभय संघांमध्ये एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. त्यासाठीही टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. पण विराट, रोहित किंवा रहाणे कर्णधार नसून केएल राहुल संघाचं नेतृत्व करेल. राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली खेळली जाणारी ही चौथी मालिका असेल. आणि यामध्ये चौथा कर्णधार टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेनंतर उभय संघांमध्ये एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. त्यासाठीही टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. पण विराट, रोहित किंवा रहाणे कर्णधार नसून केएल राहुल संघाचं नेतृत्व करेल. राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली खेळली जाणारी ही चौथी मालिका असेल. आणि यामध्ये चौथा कर्णधार टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

5 / 5
Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.