एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेवरुन आरोप-प्रत्यारोप होत आहेत. एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर राज्यातील आरोप-प्रत्यारोपांचे सत्र काही थांबवण्याचे नाव घेताना दिसत नाहीयं. यांनी कुणावर आरोप न करता आता काम करताना अशा धमक्या ह्या येणारच असल्याचे सांगितले. तर मी कोणत्याही धमक्यांना घाबरत नाही. त्यावेळी गडचिरोलीतील नक्षली भागात उद्योग उभारणीचे काम सुरु असताना अशा धमक्या पत्राद्वारे आल्याचे त्यांनी सांगितले. पण सुरक्षेबाबबत ठाकरे सरकारने कोणती भूमिका घेतली याबाबत त्यांनी काहीच सांगितले नाही. त्यामुळे त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करण्याचे टाळले की असे काहीच झालेच नाही हे त्यांना सांगायचे होते ते स्पष्ट झाले नाही.