एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात अनेक घडामोडी घडतायंत. यावर आता रावसाहेब दानवे यांनी मोठे विधान केले आहे. रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर ताशेरे ओढले आहेत. दानवे म्हणाले की, ‘ बंद खोलीत मुलाखत घेऊन काहीही बिनबुडाचे आरोप केले आहेत. शिंदेंनी पाठीत खंजीर खुपसला म्हणतात, 2019 मध्ये त्यांनी दगाफटका केला नाही? शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवेन, असं आश्वासन त्यांनी बाळासाहेब ठाकरेंना दिलं होतं. मग एकनाथ शिंदेंना हे पद का दिलं नाही. स्वार्थापोटी त्यांनी हे बिनबुडाचे आरोप केले आहेत, असे असं रावसाहेब दानवे म्हणाले. आम्ही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री कसे बनवले हा प्रश्व त्यांना पडलाय. बिहारमध्येही भाजपकडे जास्त आमदार असूनही आम्ही नितीश कुमारांना मुख्यमंत्री पद दिलं आहे.