गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नद्या, ओहोळ आणि धबधबे पुन्हा जिवंत झाले आहेत.उंच डोंगरावरून कोसळणाऱ्या या जलधारा अंगावर झेलण्याची मजा काही औरच असते.पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला कणकवलीतील सावडाव धबधबा पहिल्याच पावसामध्ये प्रवाहित झाला आहे. त्यामुळे अनेक पर्यटक सध्या या ठिकाणी गर्दी करत आहे.