मुंबईकरांसाठी मोठी बातमी, 2 लस घेऊन 15 दिवस झालेल्यांना रेल्वे तिकिट मिळणार

| Updated on: Oct 31, 2021 | 11:50 AM

राज्य सरकारनं लोकलनं प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी दिवाळी भेट दिली आहे. लसवंतांना एक दिवसासाठी लोकल प्रवासाचं तिकीट द्यावं,असं पत्र राज्य सरकारनं रेल्वे प्रशासनानाला पत्र लिहिलं आहे. कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यानंतर 14 दिवस झालेल्या नागरिकांना प्रवासासाठी तिकीट देण्यात यावं असं पत्र राज्य सरकारनं रेल्वे प्रशासनाला दिले आहे.

Follow us on

मुंबई: राज्य सरकारनं लोकलनं प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी दिवाळी भेट दिली आहे. लसवंतांना एक दिवसासाठी लोकल प्रवासाचं तिकीट द्यावं,असं पत्र राज्य सरकारनं रेल्वे प्रशासनानाला पत्र लिहिलं आहे. कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यानंतर 14 दिवस झालेल्या नागरिकांना प्रवासासाठी तिकीट देण्यात यावं असं पत्र राज्य सरकारनं रेल्वे प्रशासनाला दिले आहे.
एका दिवसाच्या प्रवासाचं तिकीट मिळणार

मुंबईकरांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. गेल्या तीन चार दिवसांपूर्वी रेल्वे प्रवाशांसाटी सिझन तिकीट देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यांना रोजच्या प्रवासासाठी तिकीट न देण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला होता.त्यामुळे रेल्वे स्टेशनवर वाद होत होते. आता राज्य सरकारनं अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना किंवा इतरांनाही एका दिवसाच्या प्रवासाचं तिकीट देण्यात यावं यासाठी पत्र लिहिलं आहे. याशिवाय कोरोना लस घेऊन 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्तींना लोकल प्रवासाचं तिकीट द्यावं. रेल्वे प्रशासनानं यासंदर्भातील खात्री करावी आणि नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असं पत्र राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागानं रेल्वेला दिलं आहे.