ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांचं भाषण अनेकांसाठी उत्सुकतेचा विषय असतो. त्यांच्या भाषणातून विरोधकांवर तोफ डागताना पाहायला मिळतात. भास्कर जाधव आणि राष्ट्रवादीचं तितकसं सख्य नाहीये. त्यांच्या मनातील हेच भाव त्यांच्या बोलण्यात उतरल्याचं पाहायला मिळाल. आज बोलताना मात्र मला आज भाषण करताना टेन्शन आलंय. कारण मला गोड बोलता येत नाही, असं भास्कर जाधव म्हणालेत. राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे (Sunil Tatkare) पुस्तक प्रकाशन सोहळ्या दरम्यान त्यांनी हे भाष्य केलंय.