एकनाथ शिंदे यांची बंडखोरी आणि त्यानंतर राज्यातील सत्तासंघर्ष सर्व देशाने बघितला. शिंदेंच्या बंडखोरीमध्ये महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. आता राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजपाने सत्तास्थापन केलीयं. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय संपूर्ण मंत्रीमंडळाचा विस्तार अघ्याप झालेला नाहीयं. यामुळे मंत्री मंडळाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. कोणाला कोणते खाते मिळते हे बघण्यासारखे आहे. यावर आता अरविंद सावंत यांनी मोठे भाष्य केले आहे. सावंत म्हणाले की, शपथविधी कधीही होईल, मला माहिती नाही. सावंतांच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी मोठे आर्श्चय देखील व्यक्त केले आहे.