मुंबई : मुळामध्ये शिवसेनेने शुद्धीकरण कार्यक्रम करण्यासाठी सुद्धा अस्तित्व आणि अधिष्ठान आहे का. कारण सत्येच्या लालसेपोटी ज्यांनी सोनियां गांधी यांच्या नावाने शपथ घेतली त्या शिवसेनेचे शुद्दीकरण करण्याची गरज आहे. बाळासाहेबांना ज्यांनी जेलमध्ये टाकले त्या छगन भुजवळबरोबर सत्येच्या लालसेपोटी सलगी करणाऱ्या शिवसेनेचे शुद्दीकरण करण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते आशिष शेलार यांनी दिली आहे.