गोव्या(Goa)ची प्रतिमा मलिन करण्याचं काम काँग्रेस(Congress)नं केलं, असा घणाघात भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी केलाय. गोव्यात भाजपाची पहिली यादी सादर करताना ते बोलत होते. यांना केवळ सत्ता यासाठी हवीय की त्यांचं लुटीच राजकारण करता यावं. अनेकजण काँग्रेस सोडत आहेत. जनतेचाही विश्वास काँग्रेसवर राहिलेला नाही. त्यामुळे पक्षाची विश्वासार्हता राहिली नाही, असं फडणवीस म्हणाले.