मुंबई : राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत अजिबात गंभीर नाही. शेतकर्यांची वीज जोडणी वीज कपात अशा प्रश्नांवर सरकारचं लक्ष नाही. सूरज जाधव नावाच्या शेतकऱ्याने आत्महत्या केली तरी देखील सरकारकडे उत्तर नाही. त्याचा निषेध म्हणून विधानपरिषदेचे कामकाज आम्ही होऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रविण दरेकर यांनी दिली आहे.