रत्नागिरीमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना संगयर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हं आहेत. कोकणातल्या जनआशीर्वाद यात्रेचे संयोजक प्रमोद जठार यांच्याविषयी शिवसेनेने तक्रार दाखल केली आहे. छत्रपती संभाजी महाराजांसोबत राणेंची तुलना केल्याने ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आलीय. शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी ही तक्रार दाखल केलीय.