मुंबई : गोव्यात राजकीय वातावरण तापू लागलं आहे. कारण निवडणूक जवळ आल्यामुळे प्रत्येक पक्षाचा मोठा नेता आता गोव्याचा दौरा करत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीदेखील त्यांच्या हटके स्टाईलने गोव्यात प्रचाराला सुरुवात केलीय. मागच्या वेळी हातातोंडाशी आलेली सत्ता गेली. पण यावेळी काहीही झालं तरी गोवा जिंकायचंच असं राहुल यांनी ठरवलं आहे. त्यांनी याच इराद्याने विजयासाठी कीक मारली आहे.