भंडाऱ्यातील काही शेतांमध्ये हरणांनी धुमाकूळ घातला आहे. जवाहरनगर परिसरातील काही शेतकऱ्यांच्या शेतात हरणांच्या कळपाने नुकसान केले आहे. हरणांनी सोयाबीनच्या पिकावर ताव मारल्याने शेतकऱ्यांच नुकसान झालं आहे. नुकतीच सोयाबीन पिकाला पिकलेली पालवी हरणांनी खाऊन फस्त केली.