Bhandara | भंडाऱ्यात हरणाच्या कळपाचा धुमाकूळ, शेतकरी हवालदिल

| Updated on: Jul 26, 2021 | 1:43 PM

भंडाऱ्यातील एका शेतकऱ्याच्या शेतात चक्क हरणांचा कळप घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या हरणांनी पिकांची नासधूस केली.

Follow us on

भंडाऱ्यातील काही शेतांमध्ये हरणांनी धुमाकूळ घातला आहे. जवाहरनगर परिसरातील काही शेतकऱ्यांच्या शेतात हरणांच्या कळपाने नुकसान केले आहे. हरणांनी सोयाबीनच्या पिकावर ताव मारल्याने शेतकऱ्यांच नुकसान झालं आहे. नुकतीच सोयाबीन पिकाला पिकलेली पालवी हरणांनी खाऊन फस्त केली.