DCM Shinde : महायुतीकडून शेतकऱ्याला 31 हजार कोटींचे पॅकेज अन् शिंदेंची मोठी घोषणा, यंदाची दिवाळी ही…

DCM Shinde : महायुतीकडून शेतकऱ्याला 31 हजार कोटींचे पॅकेज अन् शिंदेंची मोठी घोषणा, यंदाची दिवाळी ही…

Harshada Shinkar | Updated on: Oct 07, 2025 | 4:23 PM

एकनाथ शिंदे यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही अशी ग्वाही दिली. सरकारने बाधित शेतकऱ्यांसाठी ३१ हजार कोटींहून अधिक भरीव मदतीची घोषणा केली आहे. तातडीच्या १० हजार रुपयांच्या मदतीसह पिकांचे, जमिनींचे आणि घरांचे नुकसान भरून काढण्यासाठी विविध उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी “दिवाळी काळी होऊ देणार नाही” अशी भूमिका घेतली आहे. महायुती सरकारने बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ३१ हजार कोटींहून अधिक मदतीची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार, बाधित झालेल्या ३५२ तालुके आणि ६० लाख शेतकऱ्यांना तात्काळ १० हजार रुपये तातडीची मदत वाटप सुरू झाले आहे.

अजित पवार आणि कृषिमंत्र्यांसह इतर मंत्र्यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. पूर आणि अतिवृष्टीमुळे पिके वाहून गेली, जमिनी खरडून गेल्या, घरांची पडझड झाली आणि पशुधनही वाहून गेले. सरकारने शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी खंबीरपणे पाठिंबा दिला असून, कर्नाटक, पंजाब आणि तामिळनाडूच्या तुलनेत अधिक पॅकेज दिल्याचे म्हटले आहे. नुकसानग्रस्त जमिनींसाठी ४७ हजार रुपये आणि मनरेगातून प्रति हेक्टर ३ लाख रुपये दुरुस्तीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Published on: Oct 07, 2025 3:40 PM
Follow Us