गुलाब चक्रीवादळ आणि अतिवृष्टीमुळे पीकं अक्षरश: वाया गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट आलं आहे. सरकारने त्वरित तातडीची मदत करण्याची मागणी सरकारकडून होतेय. तर मदतीवरु राज्य विरुद्ध केंद्र असा सामना सुरु झाला आहे. केंद्र सरकारने मदतीबाबत सर्वच राज्यांसाठी एक सारखी भूमिका ठेवत महाराष्ट्राला मदत करावी, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र सरकराला स्वत:ला काही करायचं नाही. आणि केंद्राकडे बोट दाखवली जात आहेत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.