काय राहिलंय आता? राहिलेत ते… ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावताच भाजप नेत्याचं ते विधान चर्चेत

| Updated on: Jul 05, 2026 | 2:25 PM

ठाकरे गटातील काही आमदारही एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहेत. संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आता पक्षातील आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. येत्या मंगळवारी रात्री 7 वाजता मातोश्रीवर ही बैठक होणार असून सर्व आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. ठाकरे गटातील 6 खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षात अस्वस्थता वाढली आहे. त्यातच आदित्य ठाकरे यांचे विश्वासू मानले जाणारे सचिन आहिर यांनीही शिवसेना शिंदे गटाची साथ धरल्याने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला. शिंदे गटात प्रवेश करताच सचिन आहिर यांना विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची जबाबदारी देण्यात आली.

दरम्यान, ठाकरे गटातील काही आमदारही एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहेत. संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आता पक्षातील आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. येत्या मंगळवारी रात्री 7 वाजता मातोश्रीवर ही बैठक होणार असून सर्व आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ठाकरेंच्या या बैठक सत्रावर भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी खोचक टीका केली आहे. “ते प्रयत्न करतीलच, त्यांना पक्ष वाचवायचा आहे. मात्र आता काही करून काही अर्थ आहे का? काय उरलंय आता? जे राहिलेत पक्षात ते ही जात आहेत, रामरक्षा पठण आणि आंदोलन हा ठाकरे गटाचा एक केविलवाणा प्रयत्न आहे, फक्त स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी,” असे गिरीश महाजन म्हणाले. पुढे आदित्य ठाकरे पक्ष वाढवण्यात कमी पडले का विचारताच महाजन म्हणाले की, ‘असं कसं शक्य आहे एका वर्षभरात एखादा पक्ष अगदी नाहिसा होत आला, त्याला नेतृत्त्व कारणीभूत असेलचं.

Published on: Jul 05, 2026 2:21 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us