त्रिपुरातील कथित घटनेचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले. मुस्लिम समाजाने काढलेल्या निषेध मोर्चात अमरावती, नांदेड आणि मालेगावमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार पाहायला मिळाला. त्यानंतर भाजपकडून अमरावती बंदची हाक देण्यात आली. त्यावेळीही मोठ्या प्रमाणात दगडफेक, तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आता सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झालेत. अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर आरोप केल्यानंतर आत हाजी अराफात यांनी मलिकांवर पलटवार केलाय. अमरावती दंगलीमागे नवाब मलिकांचाच हात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.