अयोध्या, ज्ञानवापी, काशी यानंतर आता हनुमान जन्मस्थळाचा (Hanuman Birth place controversy) वाद पुन्हा उफाळून आलाय. हनुमानाचा जन्म अंजनेरीमध्ये झाल्याचा दावा करण्यात आला होता. यावरुन महंत गोविंदानंद (Mahant Govidanand) आक्रमक झालेत. त्यांनी थेट नाशिकच्या पुरोहित आणि अभ्यासकांना आव्हान दिलंय. नाशिकच्या अंजनेरीमध्ये हनुमानाचं जन्मस्थळ असल्याचा पुरावा द्या, असं आव्हानं गोविंदानंद यांनी दिलंय.