Harshwardhan Sapkal | सरकार मुकं, बहिरं आणि आंधळं आहे कारण…., ‘या’ मुद्यावरुन सपकाळांनी सरकारला खूपच सुनावलं

Harshwardhan Sapkal | सरकार मुकं, बहिरं आणि आंधळं आहे कारण…., ‘या’ मुद्यावरुन सपकाळांनी सरकारला खूपच सुनावलं

| Updated on: Apr 09, 2026 | 11:54 AM

बारामतीतील निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. अजित पवारांच्या अपघाताच्या FIR बाबतही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली.

बारामतीतील निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. अजित पवारांच्या अपघाताच्या FIR बाबतही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. अलीकडील त्यांच्या या वक्तव्याने खळबळ उडवली आहे.

सत्ताधारी पक्षाविषयी बोलताना त्यांनी ‘सरकार अजित पवरांच्या अपघाताची एफआयआर घेईल तर आम्ही निवडणुकीतून माघार घेण्याचा विचार करु, असं सांगितलं.’ पुढे ते म्हणाले, ‘या अपघाताचा गुन्हा त्यांनी इतरांच्या मागणीआधीच नोंदवून घ्यायला हावा होता. आमच्या अटीनंतरही सरकारची याविषयात काही हालचाल दिसत नाही त्यामुळे सरकार खरंच मुकं, बहिरं आणि आंधळंही आहे.’

पुढे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले ‘आपण शांतपणे निवडणूका लढू शकतो मात्र, अलीकडच्या काळात निवडणुका म्हणजे लढाई असं हिंसक वळण आलंय.’

Published on: Apr 09, 2026 11:54 AM
Follow Us