कोल्हापूर : कोरोनामध्ये राजकारण येऊ नये हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मत आहे. मात्र पियुष गोयल यांची टीका चुकीची आहे. पियुष गोयल यांना महाराष्ट्रात 5 लोकांनी ओळखलं तर सांगा. पियुष गोयल संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान करत आहेत, अशा शब्दात हसन मिश्रीफ यांनी पीयुष गोयल यांचा समाचार घेतला आहे.