Operation Sindoor : भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली कारण..; संरक्षणमंत्री राजनाथ सिंग ऑपरेशन सिंदूरवर नेमकं काय म्हणाले

Operation Sindoor : भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली कारण..; संरक्षणमंत्री राजनाथ सिंग ऑपरेशन सिंदूरवर नेमकं काय म्हणाले

| Updated on: May 11, 2025 | 5:04 PM

भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना भरतोय सैन्याची ऑपरेशन सिंदूरमधली कामगिरी आणि ब्रम्होस मिसाइलवर प्रतिक्रिया दिली.

भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत पोहोचली आहे, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी ऑपरेशन सिंदूरवर बोलताना म्हंटलं आहे. भारतीय सेनेने शौर्य, पराक्रमासोबत संयम दाखवत सडेतोड उत्तर दिल्याचं म्हणत संरक्षण मंत्र्यांनी भारतीय सैन्याचं कौतुक केलं. भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत पोहोचली. याला कारणीभूत ठरली ब्रम्होस मिसाइल, अशीही प्रतिक्रिया ब्रम्होस मिसाइलवर बोलताना संरक्षण मंत्र्यांनी दिली आहे.

ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्याने पाकिस्तानात असलेले 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलेले आहेत. त्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ला केल्यानंतर पाकिस्तानचे एअर डिफेन्स सिस्टीम देखील भारताकडून उद्ध्वस्त करण्यात आले. या संपूर्ण मोहिमेत ब्रम्होस मिसाइलचा वापर भारताकडून करण्यात आला आहे.

Published on: May 11, 2025 05:04 PM