दहीहंडीचा उत्साह राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मुंबई मोठ्या प्रमाणात दहीहंडी असतात. त्या मोठमोठ्या थरांच्या असतात. अशा वेळी दहीहंडीच्या थरासाठी लहान मुलांचा वापर करू नका अशा सुचना आणि विनंती महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी गोविंदा पथकांना केली आहे. तसेच त्यांनी यावेळी गोविंदा पथकांना शासनाने बालकांच्या संदर्भात केलेल्या नियमांचे पालन करा असेही आवाहन केले आहे. तर यावेळी उद्धव ठाकरे यांच्या तत्कालिन सरकारवर टीका करताना, त्या कसे काम केले हे राज्यातील जनतेला माहित आहे. हे सरकार सामान्यांचे सरकार आहे. आम्हाला कार्यकर्ते म्हणून जी जबाबदारी देण्यात आली आहे. ती आम्ही पार पाडू. मागिल सरकारच्या कामाबद्दल काहीही बोलू इच्छित नाही.