मुंबई : आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या निर्देशानुसार मुंबईमध्ये लॉकडाऊनमध्ये शिथीलता देण्यात आलेली आहे. त्यामध्ये व्यापाऱ्यांना आपली दुकानं दहा वाजेपर्यंत उघडी ठेवण्याचा दिलासा शासनातर्फे देण्यात आलेला आहे. परंतु हॉटेल व्यावसायिकांना मात्र यामध्ये कोणतीही सूट देण्यात आलेली नाही. त्यामुळे हॉटेल व्यवसायिक प्रशासनावर ती नाराज असून सरकारच्या विरोधात भूमिका घेण्याच्या पवित्र्यात आहे.