मुंबई : नळाद्वारे पाणी पुरवठा कऱण्यात महाराष्ट्राचा देशात १३ वा क्रमांक लागतो, अशी माहिती नुकतीच समोर आली आहे. केंद्रीय पुरवठा मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात महाराष्ट्र १३ व्या स्थानी आहे. तर राज्यातील ७२.२७ टक्के ग्रामीण कुटुंबापर्यंत घरोघरी नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची माहितीही केंद्रीय पुरवठा मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार समोर येत आहे.