‘विभागत महिला नको म्हणून डावललं’ मनिषा म्हैसरांचा महायुतीतील मंत्र्यावर गंभरी आरोप

‘विभागत महिला नको म्हणून डावललं’ मनिषा म्हैसरांचा महायुतीतील मंत्र्यावर गंभरी आरोप

| Updated on: Apr 11, 2026 | 9:14 PM

महाराष्ट्रात आधीच अनेक मोठमोठ्या प्रकरणांनी खळबळ उडवली असताना आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर यांनी महायुतीतील एका मंत्र्यावर गंभीर आरोप केले आहेत.

महाराष्ट्रात आधीच अनेक मोठमोठ्या प्रकरणांनी खळबळ उडवली असताना आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर यांनी महायुतीतील एका मंत्र्यावर गंभीर आरोप केले आहेत. ‘विभागात महिला नको म्हणून डावलण्यात आलं असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान या आरोपांवरून आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

म्हैसकरांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात विवाद सत्र सुरु झाले आहेत. अतिरिक्त सचिवांच्या या विधानावर सुप्रिया सुळे, मुख्यमंत्री फडणवीस तसेच इतर नेत्यांनी मत मांडले. ‘सरकारच्या दाबावाखाली अधिकारी काही बोलत नाहीत, तर कधी सरकारच्या दाबावाखाली काहीही करतात असं अंबादास दानवे यांनी सांगितले आहे.

Published on: Apr 11, 2026 09:14 PM
Follow Us