ठाणे : आज गुढीपाडव्याचा सण आहे. त्यानिमित्त ठाण्यातील शोभा यात्रेत ठाकरेगटाचे नेते, खासदार राजन विचारे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या कामाने सर्व जनता त्रस्त झालेली आहे. यांनी गद्दारी केली आहे. जनता यावर नाराज आहे. त्यामुळे जनता येत्या काळात धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असं राजन विचारे म्हणाले आहेत. येत्या नवीन वर्षात या ठिकाणी महाविकास आघाडीच्यामार्फत लोकहिताची गुढी उभारलेली पहायला मिळेल, असंही ते म्हणालेत.