नागपुरातील निर्बंध कमी करण्यात यावे या साठी व्यापारी रस्त्यावर उतरले आहेत. व्यापाऱ्यांनी निर्बंध कमी करावेत यासाठी आंदोलनाला सुरुवात केली आहे. संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत व्यापारी पदयात्रा काढणार आहेत. मोठ्या प्रमाणात व्यापारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. सरकार ने घालून दिलेल्या कोरोना निर्बंधा विरोधात आता व्यापाऱ्यांनी हल्लाबोल केला आहे. नागपूर पहिल्या टप्प्यात असूनही तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू केल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे.