National Security Advisory Board : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं पुनर्गठन
पहलगाम हल्ल्यानंतर वाढलेल्या भारत पाकिस्तान तणाव वाढला असून आता भारताकडून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं पुनर्गठन केलं जाणार आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं पुनर्गठन केलं जाणार आहे. माजी रॉ प्रमुख आलोक जोशी यांची आता अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. माजी एअर मार्शल पी.एम. सिन्हा हे देखील या समितीत सहभागी असणार आहेत. यचसोबत अनेक निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांचा सुद्धा या समितीत समावेश असणार आहे. दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर वाढलेल्या भारत पाकिस्तान तणावात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं पुनर्गठन हे पाकिस्तानला सूचक इशाराच असणार आहे.
Published on: Apr 30, 2025 02:47 PM
