आमचं आणि शिवसेने(ShivSena)चं जमतं हे भाजपाला पचनी पडत नाही, असं राष्ट्रवादी(NCP)चे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी म्हटलंय. भाजपानं शिवसेनेचं खच्चीकरण केल्याचा आरोपही त्यांनी केलाय. साम-दाम-दंड-भेद ही देवेंद्र फडणवीस यांची भाषा आहे. अनेक वर्ष सोबत राहून गळा कसा कापायचा, आकड्याचा खेळ कसा खेळायचा हे भाजपाकडून शिकावं, असंही ते म्हणाले.