Bilawal Bhutto : रक्ताचे पाट वाहतील म्हणणाऱ्या भुट्टोचे सूर बदलले पण थयथयाट सुरूच, आता युद्धबंदीवर म्हणतोय….

Bilawal Bhutto : रक्ताचे पाट वाहतील म्हणणाऱ्या भुट्टोचे सूर बदलले पण थयथयाट सुरूच, आता युद्धबंदीवर म्हणतोय….

Harshada Shinkar | Updated on: May 17, 2025 | 1:34 PM

पाकिस्तानच्या संसदेतील खासदारांनी भारताकडून नवीन हल्ल्याची भीती व्यक्त केली आहे. बिलावल भुट्टोने युद्धबंदीबाबत मोठा दावा केला आहे, बिलावल भुट्टोला आता वेगळीच चिंता सतावतेय

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पाऊलं उचलली होती. यावेळी सिंधू जल करार स्थगित करून भारताने पाकची चांगलीच जिरवली. यादरम्यान, पाकचा नेता बिलावल भुट्टोने भारताला धमकी देत रक्ताचे पाट वाहतील, असं वक्तव्य केलं होतं. मात्र याच बिलावल भुट्टोचे सूर आता बदलल्याचे दिसताय. बिलावल भुट्टोला युद्धबंदी कायम राहिल की नाही? याची भिती सतावत आहे. सध्याची परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे युद्धबंदी तुटल्यास जगाला धोका निर्माण होईल असा थयथयाट बिलावल भुट्टोने सुरू केलाय.

बिलावल भुट्टोच्या विधानातून असे लक्षात येते की, पाकिस्तानला युद्धबंदीचा भंग होण्याची भिती आहे. यासह पाकिस्तान ऑपरेशन सिंदूरला घाबरत आहे. यासोबतच, भारताच्या पुढील कारवाईची आणि पाकिस्तानच्या अणुयुद्धाच्या इशाऱ्याची भीती आहे. दुसरीकडे, बिलावल भुट्टोने युद्धबंदीवर बोलत  युद्धबंदी कायम राहिल की नाही याची शंका व्यक्त केली. दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज यांनी एक निवेदन जारी करत त्यांनी भारतासोबत चर्चा सुरू

Published on: May 17, 2025 1:34 PM
Follow Us