मुंबई : देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे नाव अजरामर आहे. त्यांनी देशाच्या विकासासाठी केलेले काम अमूल्य तर आहेच. मात्र, इंदिरा गांधी यांच्या निधनानंतरसुद्धा त्यांनी केलेल्या कार्याचा मोठ्या अभिमानाने उल्लेख केला जातो. त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से आजही सांगितले जातात. सध्या इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये मोठा संघर्ष सुरु आहे. इस्त्रायलकडून गाझा पट्टीत हल्ले केले जात आहेत. पॅलेस्टाईन येथील अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहेत. याच पॅलेस्टाईनमधील मोठे नेते यासिर अराफत हे इंदिरा गांधी यांना बहीण म्हणायचे. याचीच माहिती या स्पेशल रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे.