मुंबई : देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी देशाची जडणघडण, भावी वाटचाल आणि विकास यावर सविस्तर भाष्य केले.
यावेळी बोलताना मोदी “देशाच्या फाळणीने देशाला मोठी जखम केली. म्हणूनच हा फाळणीचा दिवस यापुढे दरवर्षी साजरा केला जाईल. या दिवशी फाळणीमुळे ज्यांचा मृत्यू झाला त्यांची आठवण केली जाईल,” असं मोदी म्हणाले.