देशात सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या साजरा केला गेला. त्याचप्रमाणे देशासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांची आठवन ही काढण्यात आली. दरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा स्मृतिदिन ही जवळ येत आहे. त्यापार्श्वभूमीवर शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्र लिहून एक मागणी केली आहे. खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या अस्थी भारतात आणण्याची मागणी केली आहे.