राज्यातील अंगणवाडी सेविकांनी 20 फेब्रुवारीपासून संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून अश्वासनं पूर्ण न झाल्यानं अंगणवाडी सेविकांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. राज्य सरकारकडून आश्वासन पूर्ण न झाल्यानं काम बंद आंदोलनाचा राज्यातील अंगणवाडी सेविकांनी इशारा दिला आहे. मानधन, अंगणवाड्यांचं भाडं, सेवा समाप्ती लाभ, उन्हाळ्यातील सुट्ट्या बंद झाल्यात त्या मिळाव्यात, या मागणीसाठी आंगणवाडी सेविकांनी आंदोलन केलं होतं. मात्र तरी देखील राज्य सरकारकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे २० फेब्रुवारीपासून आंदोलन पुकारलं आहे.