कावळ पिंपरीत नागरिकांनी गळ्यात बांधले कुत्र्याचे पट्टे! धक्कादायक कारण आल समोर

कावळ पिंपरीत नागरिकांनी गळ्यात बांधले कुत्र्याचे पट्टे! धक्कादायक कारण आल समोर

| Updated on: Nov 09, 2025 | 4:50 PM

पुण्याच्या शिरूर तालुक्यातील कावळ पिंपरी गावात बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. गावकरी वन विभागाकडे पिंजरे आणि रेस्क्यू टीमची मागणी करत आहेत. दरम्यान, पिंपरखेडमधील महिलांनी बिबट्याच्या मानेवरील हल्ल्यापासून स्वतःच्या संरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळे असलेले पट्टे घालण्याची अनोखी शक्कल लढवली आहे.

पुण्याच्या शिरूर तालुक्यातील कावळ पिंपरी गावात बिबट्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे गावकरी भयभीत झाले असून, त्यांनी वन विभागाकडे तातडीने पिंजरे लावण्याची आणि रेस्क्यू टीम तयार करण्याची मागणी केली आहे. शाळेच्या परिसरातही बिबट्या दिसत असल्याने मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील एका गावकऱ्याने आमदार शरद दादा सोनवणे यांच्याकडे किमान 10 ते 20 पिंजरे उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे.

या गंभीर परिस्थितीवर उपाय म्हणून, शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील महिलांनी बिबट्याच्या हल्ल्यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. बिबट्या प्रामुख्याने मानेवर हल्ला करत असल्याने, महिलांनी गळ्यामध्ये टोकदार खिळे असलेले पट्टे बनवले आहेत. कुत्र्यांच्या पट्ट्यांमुळे त्यांचे पाळीव प्राणी बिबट्यांपासून वाचल्याचे पाहून त्यांना ही कल्पना सुचली. शेतात गवत कापताना किंवा खुरपताना बिबट्याच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी अशा पट्ट्यांची शेतकऱ्यांना, विशेषतः महिलांना, अत्यंत गरज असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Published on: Nov 09, 2025 04:50 PM