अहमदनगर : मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. राजकारणात (Politics) काम करत असताना काही विधाने आम्ही करतो. मात्र काहीजणांना ते कळत नाही, म्हणून त्याचा विपर्यास केला जातो, असे रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले आहेत. 2024 नंतर राजकारणातील निर्णय हे तरुणांना घ्यायचे आहेत. त्यावेळी शरद पवार आणि अजित पवार हे आपल्याला मार्गदर्शन करतील, असे वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी केले होते. त्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. यावर बोलताना आपल्या वक्तव्याचा काही लोकांनी चुकीचा अर्थ काढला, असे ते म्हणाले. सध्या केंद्र सरकारकडून लोकशाहीचा (Democracy) गळा घोटण्याचे काम सुरू आहे. जर लोकशाही वाचवायची असेल तर ते तरुणांच्या हाती आहे. याच उद्देशाने मी बोललो होतो, असे स्पष्टीकरण आमदार पवारांनी दिले आहे.