Assembly Session | भास्कर जाधव- फडणवीसांमध्ये लक्षवेधीवरुन टोलेबाजी-tv9

| Updated on: Aug 18, 2022 | 11:37 AM

भास्कर जाधव यांना वाचण्याची गरज काय त्यांना सगळं समजतं असा टोला फडणवीसांनी लक्षवेधीवरुन भास्कर जाधव यांना लगावला.

Follow us on

मुंबई : राज्याचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू असून आज विधानसभेत दुसऱ्या दिवशी चांगलीच टोलेवाजी पहायला मिळाली. भास्कर जाधव आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांमध्ये लक्षवेधीवरुन चांगलीच लागल्याचे पाहायला मिळाले. मला उत्तर कधी मिळणार? ते मी कधी वाचणार? आणि त्यावर प्रश्न कधी विचारणार? असा प्रश्न भास्कर जाधव यांनी विचारला. त्यावर उत्तर देताना, भास्कर जाधव यांना वाचण्याची गरज काय त्यांना सगळं समजतं असा टोला फडणवीसांनी लक्षवेधीवरुन भास्कर जाधव यांना लगावला.