स्वातंत्र्याच्याआधी वीज आणि जैव आणि तंत्रज्ञान खात्याचे मंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडक होते, म्हणून त्यांनी त्या काळी भाक्रा नांगल, दामोदर व्हॅलीसारखी निर्मिती करण्याचे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतले. शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आम्ही नाव का घेतो, हे ज्यांना समजत नाही. त्यांना महाराष्ट्र समजला नाही अशी टीका शरद पवार यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता केली. शिवाजी महाराजांपासून ते अगदी शाहू, फुले, आंबेडकरापर्यंत या सगळ्या थोर माणसांनी आपल्या कतृत्वानं देश आणि राज्यासाठी योगदान दिले आहे असेही त्यांनी सांगितले.