Solapur | सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन, शौर्य प्रतिष्ठानची स्थलांतराची मागणी

Solapur | सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन, शौर्य प्रतिष्ठानची स्थलांतराची मागणी

| Updated on: Apr 02, 2026 | 4:01 PM

सोलापूर जिल्ह्यात महापुरुषांच्या पुतळ्यावरून उफाळलेल्या वादाला आणखी तीव्र स्वरूप प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर शौर्य प्रतिष्ठानचे बाळराजे आवारे हे आंदोलकांच्या ठिकाणी दाखल झाले आहेत. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर धनगर समाजाचे बांधव मोठ्या संख्येने एकवटले असून त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

सोलापूर जिल्ह्यात महापुरुषांच्या पुतळ्यावरून उफाळलेल्या वादाला आणखी तीव्र स्वरूप प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर शौर्य प्रतिष्ठानचे बाळराजे आवारे हे आंदोलकांच्या ठिकाणी दाखल झाले आहेत. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर धनगर समाजाचे बांधव मोठ्या संख्येने एकवटले असून त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एकीकडे आंदोलन सुरू असताना धनगर समाजाकडून घोषणाबाजीही करण्यात येत आहे.
शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने असा आरोप करण्यात आला आहे की, श्री खेलोबा देवस्थानच्या प्रवेशद्वारात मध्यरात्री कोणतीही अधिकृत परवानगी न घेता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला. काही समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने हा प्रकार घडवण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. शौर्य प्रतिष्ठानने स्पष्ट केले की, त्यांचा विरोध पुतळ्याला नसून तो उभारण्यात आलेल्या जागेला आहे. देवस्थानच्या प्रवेशद्वारावरील ही जागा असल्याने पुतळा योग्य त्या ठिकाणी स्थलांतरित करावा, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. या प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे.

Published on: Apr 02, 2026 04:01 PM
Follow Us