Anil Parab : विधान परिषदेत अनिल परब भडकले अन् सभागृहात एकच गदारोळ, नेमकं घडलं काय?

Anil Parab : विधान परिषदेत अनिल परब भडकले अन् सभागृहात एकच गदारोळ, नेमकं घडलं काय?

| Updated on: Dec 09, 2025 | 2:41 PM

महाराष्ट्र विधान परिषदेत एका टेंडर प्रकरणावरून अनिल परब यांनी अधिकारी निलंबन आणि एसआयटी चौकशीची मागणी केली. संबंधित अधिकारी वाल्मी येथे बदली झाल्याचे मंत्र्यांनी सांगितले. सभागृहातील सदस्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन सभापतींनी दोन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश देत एसआयटी स्थापन करण्यास सहमती दर्शवली.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या अधिवेशनात एका टेंडर प्रकरणावरून जोरदार गदारोळ झाला. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार अनिल परब यांनी या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्याचे तात्काळ निलंबन करून उच्चस्तरीय विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्याची मागणी केली. जोपर्यंत अधिकारी पदावर आहे, तोपर्यंत निष्पक्ष चौकशी होऊ शकत नाही, अशी भूमिका परब यांनी मांडली. यावर संबंधित मंत्र्यांनी उत्तर देताना सांगितले की, या प्रकरणी भ्रष्टाचारविरोधी पथकाद्वारे (एसीबी) चौकशी सुरू आहे. तसेच, ज्या अधिकाऱ्यावर आरोप आहेत, त्यांची बदली वाल्मी येथे करण्यात आली आहे. सभागृहातील सदस्यांनी या प्रकरणात तीव्र भावना व्यक्त केल्या. शेवटी सभापतींनी सर्व सदस्यांच्या भावनांचा आदर करत या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली. ही एसआयटी दोन महिन्यांत आपला अहवाल सादर करेल, असेही सभापतींनी स्पष्ट केले.

Published on: Dec 09, 2025 02:41 PM