गुरुवारचा दिवस तळीयेतल्या गावकऱ्यांसाठी काळा दिवस ठरला. घरांवर दरड कोसळून आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अजूनही 50 जण बेपत्ता आहे. या दुर्घटनेत कुणी आई-वडील गमावले तर कुणी आधारच गमावला आहे. त्यामुळे तळीयेतील ग्रामस्थांचे अश्रू थांबता थांबत नाहीय.